शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

स्वच्छतेला महत्त्व देण्याची गरज - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 2:49 AM

पुणे जिल्ह्यात सुमारे २५ हजार अन्न पदार्थ विक्रेते आहेत. मात्र केवळ ३ हजार व्यावसायिकांनी अन्न परवाना घेतला आहे. परवाना घेतलाच पाहिजे, शिवाय पदार्थांचा दर्जा राखला पाहिजे. स्वच्छता महत्त्वाची आहे.

चिंचवड : पुणे जिल्ह्यात सुमारे २५ हजार अन्न पदार्थ विक्रेते आहेत. मात्र केवळ ३ हजार व्यावसायिकांनी अन्न परवाना घेतला आहे. परवाना घेतलाच पाहिजे, शिवाय पदार्थांचा दर्जा राखला पाहिजे. स्वच्छता महत्त्वाची आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित हा व्यवसाय असल्याने स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. बापट यांनी अन्नपदार्थ विक्रेत्यांना रीतसर परवानगी घेऊन व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. कार्यशाळेस अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ़ पल्लवी दराडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, एमसीसीआयएच्या अन्न प्रक्रिया विभागाचे अध्यक्ष आनंद चोरडिया आदी उपस्थित होते.अन्न आयुक्त डॉ़ पल्लवी दराडे यांनी हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व्यावसायिकांनी कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करणाºयांनी दर्जासह स्वच्छतेस प्राधान्य द्यावे, असे नमूद केले. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संपत देशमुख कार्यशाळेदरम्यान गिरीश बापट यांच्याबरोबर उपस्थित अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिकांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.प्रास्ताविक सहायक आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले. अन्नसुरक्षा अधिकारी संतोष सावंत यांनी सूत्रसंचालन केले. पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, सहायक आयुक्त संजय नारागुडे, अ. गो. भुजबळ, सं. पां. शिंदे, श्रीमती भोईटे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी एस़ पी़ धुळे, दिलीप करंजखेले, के़ बी़ जाधव, भांडवलकर, आऱ जे़ जेकटे, आऱ जी़ नागवेकर, एल़ एस़ सावळे यांनी पुढाकार घेतला होता.स्वच्छता हीच परमेश्वरी तत्त्व असल्याने त्याचा सर्व अन्न व्यावसायिकांनी अवलंब करावा. तसेच अन्न सुरक्षेबाबतचे महत्त्व विशद करून अशा प्रकारच्या कार्यशाळा अधिकाधिक आयोजित कराव्यात.- गिरीश बापट, पालकमंत्री

टॅग्स :girish bapatगिरीष बापटpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र