शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

महापालिकेचे १३ घनकचरा स्थानांतरण केंद्र कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 20:30 IST

आवश्यक भूसंपादन नसल्यामुळे १३ स्थानांतरण केंद्र कागदावरच राहिली आहेत.

पिंपरी : शहरात दररोज सुमारे १२०० टनापेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून मोशी कचरा डेपोत वाहून नेण्यासाठी १६ ठिकाणी कचरा स्थानांतरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. यापैकी केवळ तीनच स्थानांतरण केंद्र तयार करण्यात आली आहेत. आवश्यक भूसंपादन नसल्यामुळे १३ स्थानांतरण केंद्र कागदावरच राहिली आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आठ क्षेत्रीय कार्यालय आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात दोन अशी १६ केंद्रे उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यातील बहुतांश केंद्राची जागा ही लोकवस्तीच्या भागाला लागून असल्यामुळे नागरिकांची याबाबत नाराजी आहे. केंद्रे उभारण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचा ताबा मिळवण्यात महापालिकेला यश येताना दिसत नाही. त्यामुळे घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. सध्या कासारवाडी, भोसरी गवळीमाथा, आणि काळेवाडी येथे केंद्रे तयार केली आहेत. त्यातील काळेवाडी स्थानांतरण केंद्र मागील पाच महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे.घनकचरा स्थानांतरण केंद्र पूर्णतबंदिस्त असल्याने परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होत नाही. एक केंद्र उभारण्यासाठी २ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेला केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाकडून ४६ कोटी मिळाले आहेत. महापालिका घनकचरा स्थानांतरण केंद्राला कधी मुहूर्त मिळणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिका