शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महापालिकेतील कारभार : लेखापरीक्षणाची राज्य सरकारकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 06:19 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अंतर्गत लेखापरीक्षण गैरव्यवहार प्रकरणाची राज्य सरकारकडून चौकशी होणार असून, राज्य सरकारने महापालिकेकडून माहिती मागविली आहे. सरकारचे कार्यासन अधिकारी दिलीप वाणिरे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठविले आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अंतर्गत लेखापरीक्षण गैरव्यवहार प्रकरणाची राज्य सरकारकडून चौकशी होणार असून, राज्य सरकारने महापालिकेकडून माहिती मागविली आहे. सरकारचे कार्यासन अधिकारी दिलीप वाणिरे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठविले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखापरीक्षणाबाबत सन १९९९-२००० मध्ये सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार अठरा वर्षांचे अंतर्गत लेखापरीक्षण करण्यात आले. १९८२-८३ ते २००९-१० च्या लेखापरीक्षणातील रक्कम वादाच्या भोवºयात सापडली असल्याचे भापकर यांनी पत्रात म्हटले होते. याचिकेबाबत निकाल देताना उच्च न्यायालयाने संबंधितांवर कारवाई करून या रकमा संबंधितांकडून वसूल करून त्यांच्यावर कारवाई करावी, असा निर्णय दिला होता.१९९२ या आर्थिक वर्षांपासून महापालिकेचे पूर्णपणे लेखापरीक्षण झालेले नाही. संबंधित विभागांनी खर्च रकमेच्या फायली उपलब्ध करून न दिल्यामुळे ही रक्कम आक्षेपाधीन राहिली आहे. यासंदर्भात मुख्या लेखापरीक्षक विभागामार्फत सर्व विभागांना वेळोवेळी लेखी कळवूनही फायली उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे दर वर्षी आक्षेपाधीन रकमेत वाढच होत चालली आहे. याबाबत भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखापरीक्षणाबाबत कार्यवाहीचे आदेश द्यावेत, माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमून चौकशी करावी. २०१७ पर्यंतच्या लेखापरीक्षणातील गैरकारभाराची चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. राज्य सरकारचे कार्यासन अधिकारी दिलीप वाणिरे यांनी पालिकेला पत्र पाठविले आहे. याप्रकरणी तत्काळ राज्य सरकारला अभिप्राय पाठविण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत.महापालिकेत ४५ जणांना नोटीसमहापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर म्हणाल्या, ‘‘लेखापरीक्षण आक्षेपांची पूर्तता करण्यासाठी सर्व विभागांकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. तसेच सर्व विभागांना परिपत्रकाद्वारे कळवून सर्व रेकॉर्ड उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. पन्नास टक्के रेकॉर्ड मिळाले आहे. आॅडिटला रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नाही म्हणून काही विभागांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. ४५ लोकांना नोटीस पाठविली आहे. त्यांच्याकडून दंड आकारला जाईल. सर्व विभागांची माहिती जमा झाल्यानंतर तातडीने शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार