शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

उद्योगांचे स्थलांतर हा चुकीचा प्रचार; सुप्रिया सुळेंनी हिंजवडीची बदनामी थांबवावी, फडणवीसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:21 IST

महाविकास आघाडीच्या काळात सर्वाधिक उद्योग शहराबाहेर गेले आहेत

पिंपरी : हिंजवडीतील उद्योगांचे स्थलांतर होत आहे, असा चुकीचा प्रचार केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात सर्वाधिक उद्योग शहराबाहेर गेले आहेत, ते राज्याबाहेर गेले नाहीत, त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीची बदनामी थांबवायला हवी. लोकसंख्यावाढीच्या तुलनेमध्ये पाणी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. आपले सरकार पुन्हा आल्यानंतर पिंपरी-चिंचवडकरांना पाणी कमी पडू देणार नाही. वेगवेगळ्या धरणांतून पाणी आणले जाईल. महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाकड येथे केले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ बुधवारी वाकड-काळेवाडी फाटा येथील मैदानावर सभा झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, पिंपरी-चिंचवडच्या विकासामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या निधनानंतर आमदार अश्विनी जगताप यांनी उत्तम काम केले आणि त्यानंतर आता शंकर जगताप निवडणुकीमध्ये उतरले आहेत. विकासाचा आमदार म्हणून आपल्याला त्यांना निवडून द्यायचे आहे. पुनावळेतील कचरा डेपोचा प्रश्न आपण सोडवला आहे. पुण्याच्या परिसरामध्ये होणाऱ्या ३० हजार कोटींच्या रिंगरोडमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. त्याचा फायदा पिंपरी-चिंचवडकरांना होणार आहे.

महायुतीमुळे चिंचवड विकासाच्या वाटेवर : शंकर जगताप

शंकर जगताप म्हणाले की, महायुतीने मला संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ विकसनशील आहे. त्याला विकासाच्या वाटेवर नेण्याचे काम गेल्या वीस वर्षांत महायुतीच्या नेत्यांनी केले आहे. त्यामुळेच ही सोनेरीनगरी उभी राहिली आहे. आमदार लक्ष्मणभाऊ गेल्यानंतर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडला आधार दिला.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीPoliticsराजकारण