शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आयटी कर्मचाऱ्यांच्या 'वर्क फ्रॉम होम' चा घर मालकांना मोठा आर्थिक फटका; भाडेकरू मिळेनात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 14:18 IST

खासगी कंपनीतील ८० कर्मचारी हे भाड्याने राहतात...

ठळक मुद्देबहुतांश कर्मचारी हे शहरातून निघून गेल्याने सर्वच व्यवसायांवर परिणामपुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम सुरूच राहणार अशी शक्यता

पिंपरी : आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम असल्याने देशभरातून नोकरीसाठी आलेले कर्मचारी मूळ गावी गेले आहेत. खासगी कंपनीतील ८० कर्मचारी हे भाड्याने राहतात. वर्क फ्रॉम होम असल्याने कर्मचारी मूळ गावी गेले आहेत. त्यांनी भाड्यांची घरे सोडली आहेत. त्यामुळे शहरातील घर मालकांना भाडेकरू मि‌‌ळत नसल्याची स्थिती आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. हिंजवडी भागात आयटी कंपन्या आल्यामुळे शहरात देशभरातून चाकरमानी रोजगारासाठी आले. कोरोनामुळे जवळपास ९ महिने झाले वर्क फ्रॉम होम सुरू आहे. याचा मोठा आर्थिक फटका या भागातील उद्योगांवर झाला आहे. वर्क फ्रॉम होममुळे कर्मचारी आपल्या मूळ गावातून काम करत आहेत. कोरोनाच्यापूर्वी हिंजवडी आणि परिसरात भाड्याने फ्लॅट मिळणे कठीण होते. मागणी जास्त असल्याने भाडेदेखील वाढले होते. कोरोनामुळे शहरातील बहुतांश फ्लॅट रिकामे झाले आहेत. त्यामुळे आता भाडे कमी झाले आहेत. हिंजवडी भागात अनेकांनी उत्पन्न मिळावे म्हणून फ्लॅट भाड्याने देणे, हॉस्टेल, रूम भाड्याने देणे आदी व्यवसाय कर्ज काढून सुरू केले आहेत. परंतु सध्या भाडेकरू नसल्याने या लोकांचे उत्पन्न थांबले आहे. सर्वच नामांकित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी आवश्यक लागणारे साहित्य दिले आहेत. पुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम सुरूच राहणार अशी शक्यता आहे.

---इतर व्यवसायावर झाला परिणाम

खासगी क्षेत्रात काम करणारे बहुतांश कर्मचारी हे शहरातून निघून गेल्याने सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. रिअल इस्टेट, हॉटेल, खासगी कार वाहतूक, हिंजवडी भागातील लहान व्यवसाय, खानावळी आदी व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.--

भाडे झाले कमीपूर्वी                                          आता

१ बीएचके १२ हजार                 ८ ते ९ हजार२ बीएचके १५ ते १७ हजार       १२ हजार

--वर्क फ्रॉम होम असल्याने बहुतांश कर्मचारी गावी गेले आहेत. ८० टक्के कर्मचारी भाड्याने राहत होते. त्यामुळे याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. हिंजवडी भागातील हॉस्टेल्स सध्या रिकामे आहेत. रिअल इस्टेट व्यवसायाला याचा फटका बसला आहे.- संतोष मांदळे, रिअल इस्टेट एजंट; 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याITमाहिती तंत्रज्ञानhinjawadiहिंजवडीHomeघरbusinessव्यवसाय