शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

लाल मिरचीला महागाईची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 4:36 AM

परराज्यांतून आवक : गतवर्षीच्या तुलनेत भाववाढ होऊनही मसाला तयार करण्यासाठी मागणी

पिंपरी : वर्षभरासाठी लागणारा मसाला करण्याची लगबग आणि लग्नसराई यामुळे लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत ग्राहकांची मिरचीला मागणी वाढली आहे. विविध प्रकारच्या मिरच्या आणि मसाल्यासाठी लागणारे पदार्थांचे भाव वधारले आहेत.बाजारात साधारण १२० रुपयांपासून २०० रुपये किलोपर्यंत मिरची उपलब्ध आहे. लवंगी, तेजा, गुंटुर, शंकेश्वरी, चपाटा, रसगुल्ला, बॅडगी, काश्मिरी, रेशमपट्टा या प्रकारच्या मिरच्या बाजारात उपलब्ध आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश या ठिकाणहून मिरची बाजारात दाखल होते. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी भाव थोडे वाढल्याची चर्चा ग्राहकांमध्ये आहे.गेल्या वर्षी साधारणपणे १०० रुपये किलो असा भाव मिरचीला होता त्यात या वर्षी काही प्रमाणात वाढ झाली आहे. गृहिणींची सध्या वर्षभरासाठी लागणारा मसाला तयार करण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे मसाल्यासाठी लागणारी मिरची व मसाल्याचे पदार्थ घेण्यासाठी गृहिणी मिरची बाजाराकडे वळू लागल्या आहेत. मसाल्यासाठी लागणारे इंदोरी, गावरान, ग्रीन धने बाजारात उपलब्ध आहेत. गृहिणींकडून धन्यांना सर्वाधिक मागणी आहे.हॉटेल व्यावसायिकांकडून देखील याच दिवसांत मिरची खरेदी करून ठेवली जाते. पदार्थ झणझणीत करण्यासाठी व त्याला तर्री येण्यासाठी शंकेश्वरी व रेशमपट्टा मिरची हॉटेल व्यावसायिक खरेदी करीत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. त्याचप्रमाणे लग्नसराई सुरू असल्यामुळेही लग्नातील चमचमीत जेवण तयार करण्यासाठी मिरची व मसाल्याची मागणी वाढली आहे.गुंटूर, लवंगी : तिखट खाणाऱ्यांना चवपिंपरीच्या लालबहादूर शास्त्री मंडईत शंकेश्वरी (१४० रु. किलो), रेशमपट्टा (२०० रु. किलो) व ब्याडगी (१८० रु. किलो) या मिरचीला सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय लवंगी (१२० रु. किलो), तेजी (१४० रु. किलो), चपाटा (१६० रु. किलो), रसगुल्ला (२०० रु. किलो), काश्मिरी (२०० रु. किलो) या मिरच्याही उपलब्ध आहेत. कमी तिखट खाणाºया कुटुंबाची ब्याडगी मिरचीला पसंती आहे. ही मिरची चवदार व गडद रंगाची असते. तर झणझणीत व जास्त तिखट खाणाºया कुटुंबाची गुंटूर, लवंगी व तेजा या मिरचीला अधिक मागणी आहे. लवंगी, तेजा, गुंटुर, शंकेश्वरी, चपाटा, रसगुल्ला, बॅडगी, काश्मिरी, रेशमपट्टा या प्रकारच्या मिरच्या बाजारात उपलब्ध आहेत.दर वर्षीच एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मिरचीची मागणी वाढते. मिरचीप्रमाणेच मसाल्याचे पदार्थही आवर्जून खरेदी केले जातात. मसाले तयार करणाºया बचत गटांकडून या दिवसात मिरचीला जास्त मागणी असते.’’- नितीन ब्राह्मणकर, विक्रेतेआम्ही दर वर्षी घरगुती मसाला तयार करतो. बाजारातील रेडिमेड मसाल्यापेक्षा घरी तयार केलेला मसाला परवडतो. त्याचप्रमाणे आपल्याला हवा तसा कमी-जास्त तिखट करता येतो. त्यामुळे आम्ही मिरची खरेदी करूनच मसाला तयार करतो.- अश्विनी कुंभार, गृहिणीहॉटेलमधील चमचमीत पदार्थ तयार करण्यासाठी उत्तम दर्जाची मिरची आवश्यक असते. रेडिमेड मसाल्यात वापरलेल्या मिरचीची गुणवत्ता आपण तपासू शकत नाही. त्यामुळे पदार्थांना चवदेखील येत नाही. उत्तम दर्जाची मिरची वापरल्यामुळे पदार्थांची गुणवत्ता टिकून ठेवता येते.’’- मनोज चव्हाण, हॉटेल व्यावसायिक

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड