शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंबी येथे इंद्रायणी नदीमध्ये वाढले प्रदूषण : प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 14:07 IST

इंद्रायणी नदीच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असून, नदीचे पाणी जलचर, प्राणी व मानवी आरोग्यास धोकादायक झाले आहे.

ठळक मुद्देऔद्योगिक क्षेत्रातील पाणी सोडल्याने धोकागावातील तरुण मंडळ व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची काळाची गरज

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी तसेच काही गावांतील दूषित सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडल्याने आंबी, वराळे गावच्या हद्दीत नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे.इंद्रायणी नदीच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असून, नदीचे पाणी जलचर, प्राणी व मानवी आरोग्यास धोकादायक झाले आहे. नदीपात्रात सोडले जाणारे रासायनिक व दूषित सांडपाणी रोखून नदीपात्रातील जलपर्णी  काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या मावळ तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक  असल्याने तालुक्यातील इंद्रायणी, पवना, कुंडलिका, सुधा, आंद्रा या नद्यांचे पात्र असून, पावसाळ्यात दुथडी वाहतात. या नद्यांचे पाणी अमृत मानले जाते तर याच पाण्यावर अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याच्या नळपाणीपुरवठा योजना आहेत. मात्र सध्या या नदीचे पाणी दूषित झाले असून, जलचर, प्राणी व मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्राचा दिवसेंदिवस विकास झाल्याने नागरीकरणात वाढ होत आहे. कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी, मेला, तसेच कचरा, ओढे व नाल्यांतून नदीपात्रात सोडले जाते तसेच गावोगावचे व गृहप्रकल्पाच्या दूषित सांडपाण्याचे व्यवस्थापन अथवा कोणतीही प्रक्रिया न करता सर्रासपणे नदीपात्रात सोडले जात आहे. तसेच नदीपात्रात कपडे, म्हैशी, बैल, गायी व इतर जनावरे धुतली जातात. देवाच्या पूजेचे साहित्य पात्रात टाकले जाते.ग्रामपंचायती, नगर परिषद व औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांनी त्यांच्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करूनच नदीपात्रात सोडावे. नदीपात्रात जलपर्णी काढण्यासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद नाही. नदी प्रदूषण रोखण्यासाठी गावातील तरुण मंडळ व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची काळाची गरज आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. .........पिण्याचे पाणीही दूषित : आरोग्य धोक्यातमावळ तालुक्यात मुबलक पाणी मिळत आहे. मात्र नदीच्या उगमस्थानापासून प्रदूषण सुरू होते ते शेवटपर्यंत प्रदूषण असते. ग्रामपंचायत, नगर परिषद व औद्योगिक कारखान्यांच्या पिण्याच्या पाण्याचे जोडलेल्या जलवाहिनीच्या नदीपात्राजवळची स्थिती खूपच बिकट आहे. पाणी शुद्धीकरण केले तरी त्यातील रासायनिक घटक पाण्यातच असल्याने जलचर, प्राणी व मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांडपाणी नदीत न सोडण्याचे ठराव केवळ कागदोपत्रीच मंजूर केले जात असून, प्रत्यक्ष कारवाई केली जात नाही. ग्रामपंचायती, नगर परिषद व औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांनी त्यांच्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करूनच नदीपात्रात सोडावे. नदीपात्रात जलपर्णी काढण्यासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद नाही. नदी प्रदूषण रोखण्यासाठी गावातील तरुण मंडळ व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची काळाची गरज आहे. तसेच दूषित सांडपाणी नदीपात्रात सोडणाºयांवर कारवाई केली तर हे थांबेल अन्यथा तालुक्यातील नदीपात्रात पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. 

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळriverनदीpollutionप्रदूषणenvironmentवातावरण