शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

रात्री विषबाधा झाल्यास मुलींना रुग्णालयात नेण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही

By नारायण बडगुजर | Updated: February 11, 2025 09:48 IST

वसतिगृहात पिझ्झा मागवल्याचे प्रकरण: पुणे येथील स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड्स या संस्थेने वसतिगृहाकडे खुलासा मागितला

- नारायण बडगुजरपिंपरी : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या मोशी येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील एका खोलीत पिझ्झाचा रिकामा बॉक्स आढळला. यावरून वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी संबंधित खोलीत राहणाऱ्या मुलींना एक महिन्यासाठी वसतिगृहातून काढून टाकण्याची नोटीस दिली. याबाबत पुणे येथील स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड्स या संस्थेने वसतिगृहाकडे खुलासा मागितला. त्यानुसार वसतिगृहाकडून खुलासा करण्यात आला. बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने मुलींना विषबाधा झाली आणि रात्रीच्या वेळी त्यांना त्रास झाला तर वसतिगृहाकडे विद्यार्थिनिंना रुग्णालयात नेण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे वसतिगृहाकडून सांगण्यात आले आहे.

वसतिगृहातील एका खोलीत ३० जानेवारी रोजी पिझ्झाचा एक रिकामा बॉक्स आढळून आला. त्याबाबत वसतिगृहाच्या गृहप्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी संबंधित खोलीत राहणाऱ्या चार विद्यार्थिनिंकडे विचारणा केली. चारही विद्यार्थिनिंनी आपण पिझ्झा मागवला नसल्याचे सांगितले. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी गृहप्रमुखांनी विद्यार्थिनिंना नोटीस दिली. त्यामध्ये ८ फेब्रुवारीपर्यंत चूक मान्य न केल्यास विद्यार्थिनिंचा एक महिन्यासाठी प्रवेश रद्द करण्यात येईल, असे नोटीसमध्ये सांगण्यात आले होते.दरम्यान, एका विद्यार्थिनीला तिच्या पालकांनी घरी नेले. याबाबत स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड्स संस्थेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी वसतिगृहाकडे खुलासा मागवला. वसतिगृहाकडून खुलासा करण्यात आला असून त्यामध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्यास बाधा होऊ नये म्हणून बाहेरील खाद्यपदार्थ वसतिगृहात आणून खाण्यात बंदी असल्याचे सांगितले आहार.

सध्या उन्हाळा सुरू होत आहे. अशा वेळी खाद्यपदार्थ हे लवकर खराब होतात. बाहेरील अन्नपदार्थ कधी बनवले, त्यासाठी लागणारे अन्नघटक हे कमी गुणवत्तेचे वापरले असू शकतात. तसेच सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात जीबीएस या आजाराचे प्रमाण वाढत आहे. हा आजार दूषित पाणी व दूषित पाण्यात बनवलेले अन्नपदार्थ खाण्यामुळे होऊ शकतो. विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यास रात्रीच्या वेळी त्रास झाल्यास वसतिगृहात सर्व महिला कर्मचारी आहेत. रात्रीच्या वेळी एकच महिला पहारेकरी असते. अशा वेळी विषबाधेचा प्रकार घडल्यास विद्यार्थिनींना वेळेत रुग्णालयात घेऊन जाण्यास वसतिगृहात पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. वसतिगृह परिसरात त्वरित रिक्षा व इतर साधने उपलब्ध होऊ शकत नाहीत.पहारेकरी महिला रुग्णालयात गेल्यास इतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. या बाबींचा विचार करून खाद्यपदार्थ वसतिगृहात आणून खाण्यास बंदी घालण्यात आली. वसतिगृहातून कोणत्याही विद्यार्थिनीला काढले नाही. एक विद्यार्थिनी तिच्या पालकांसोबत घरी गेली आहे. ती आल्यास तिला देखील वसतिगृहात घेतले जाणार असल्याचे खुलाशात म्हटले आहे.

वसतिगृहाकडून केलेला खुलासा अतिशय हास्यास्पद आहे. सामाजिक न्याय विभागाची अवस्था यातून समोर येत आहे. शासकीय व्यवस्थेची ही बदनामी आहे. -कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड्स, पुणे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रfoodअन्न