शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

PMPML: पुणे, पिंपरीत पाऊस पडला जोमात; पण पीएमपीएमएल गेली कोमात

By तेजस टवलारकर | Updated: July 20, 2022 12:56 IST

पावसामुळे पीएमपीएमएलच्या दिवसाला सरासरी ३०० बस फेऱ्या रद्द

पिंपरी : पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहरात मागील आठवडाभर पाऊस झाला. दोन्ही शहरातील जनजीवनावर पावसाचा परिणाम झाला. आठवडाभर झालेल्या पावसाचा फटका प्रवाशांबरोबरच पीएमपीएमएलला बसला. पावसामुळे पीएमपीएमएलला दिवसाला सरासरी ३०० बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. म्हणजेच मागील आठवड्यात २,१०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. रद्द झालेल्या बस फेऱ्या, सततच्या पावसाने कमी झालेली प्रवासी संख्या याचा आर्थिक फटका पीएमपीएमएलला बसला.

पावसामुळे मागील आठवड्यात दिवसाला सरासरी ५० ते ६० हजारांनी प्रवासी संख्या कमी झाली होती. परिणामी दैनंदिन उत्पन्न १० ते १२ लाखांनी कमी झाल्याचा पीएमपीएमएल प्रशासनाचा अंदाज आहे. आता रविवारपासून पाऊस कमी झाला आहे. परिणामी बस फेऱ्या पूर्वरत होत असून, प्रवासी संख्यादेखील वाढली आहे, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाने दिली.

पुणे, पिंपरी - चिंचवड शहर आणि परिसरात पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दिवसाला सरासरी ११ ते १३ लाख प्रवासी पीएमपीएमएलने प्रवास करतात. तसेच दिवसाला १८ ते १९ हजार बस फेऱ्या होत असतात. परंतु मागील आठवड्यात पाऊस झाल्याने बसचे वेळापत्रक कोलमडले होते. तसेच अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द झाल्या होत्या. याचा फटका प्रवाशांना देखील बसला.

पीएमपीएमएलची सद्यस्थिती

दैनंदिन होणाऱ्या फेऱ्या : १८ ते १९ हजारदैनंदिन धावणाऱ्या बस : १,५४०दैनंदिन प्रवासी संख्या : १० ते १२ लाखदैनंदिन उत्पन्न : १.२५ ते १.५० कोटी

मागील आठवड्यात असा बसला पावसाचा फटका

दैनंदिन नुकसान : १२ ते १३ लाखघटलेली प्रवासी : ५० ते ६० हजारदिवसाला रद्द झालेल्या फेऱ्या : ३००

प्रवासी संख्या आणि दैनंदिन उत्पन्नदेखील घटले

मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे दिवसाला होणाऱ्या फेऱ्यांपैकी काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. परिणामी प्रवासी संख्या घटली आणि दैनंदिन उत्पन्नदेखील घटले. रविवारपासून पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे आता फेऱ्या पूर्वीप्रमाणे होत आहेत. - दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीMONEYपैसाticketतिकिटRainपाऊस