शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

'महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री होतं'; भाजप नेते राम कदमांची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 15:25 IST

भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांचा घणाघात...

- प्रकाश गायकर

पिंपरी : दोन दिवसांपूर्वी पेंग्विन सेनेचे नेते आले होते. त्यांनी सांगितलं वेदांता भाजपामुळेगुजरातला गेली. मात्र हे पाप महाविकास आघाडी सरकारने केले नसते तर तुमच्या-आमच्या पोरांना वणवण फिरावे लागले नसते. अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे मोजून पाच वेळा मंत्रालयात गेले, कसे आपल्याकडे प्रकल्प येतील. कंपनीचे लोक सांगत होते की, आम्हाला महाराष्ट्रात कंपनी टाकायची आहे. त्यावेळी हे वसुली बहाद्दर आम्हाला किती देणार असे बोलत होते. त्यांच्या या पापामुळे वेदांता बाहेर गेली असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांनी सोमवारी (दि. 26) केला.

मावळ तालुक्यात नियोजित असलेल्या वेदांता फॉक्सकॉन कंपनीचे गुजरातमध्ये स्थलांतर झाले. याला जबाबदार महाविकास आघाडी सरकार असून तत्कालीन आघाडी सरकारने जनतेची दिशाभूल केली असल्याचे भाजप युतीकडून सांगितले जात आहे. तत्कालीन राज्य सरकारच्या विरोधात मावळ भाजपा, शिंदे गट व आरपीआय यांच्यावतीने सोमवारी (दि. 26) वडगावमधील पोटोबा मंदिर ते पंचायत समिती या दरम्यान निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर वडगाव पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी मार्गदर्शन करताना राम कदम बोलत होते.

कदम म्हणाले, कंपनी सांगत होती आम्हाला राज्यात तळेगावमध्ये प्रकल्प सुरू करायचा आहे. मात्र मुख्यमंत्री तोंडावरील मास्क काढायला तयार नव्हते. मविआमधील लोक खोटं सांगत आहेत. जर कंपनी आली होती तर करार दाखवा, भूसंपादन झाले होते तर सर्व्हे नंबर सांगा. आम्ही यापुढे राज्याच्या गावागावात जाऊन खरे सांगू की कंपनी कोणामुळे बाहेर गेली. आदित्य ठाकरे यांच्यामध्ये थोडी नैतिकता शिल्लक असेल तर खोटं बोलल्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेची जाहीर माफी मागावी असेही राम कदम म्हणाले.मविआ दळभद्री सरकार होतंजगाच्या इतिहासामध्ये एकमेव घटना अशी आहे जिथे मंत्री सोडून गेले. तीन पक्षांचे जे सरकार होते ते खऱ्या अर्थाने फुटक्या पायाचे होते. त्याचबरोबर मविआचे सरकार हे दळभद्री सरकार होतं. सत्तेत आल्यापासून सगळे बंद अशी अवस्था होती. मंदिरे बंद आणि दारूचे दुकाने सुरू होती. मात्र राज्यात एका विचाराचे आमदार, खासदार एकत्र आले. एका विचाराचे शिंदे-फडणवीस सरकार आले आणि सर्व सण उत्सव सुरू झाले असे राम कदम म्हणाले.एक कोटी रुपयांचे बक्षीस जिंकामविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे दहा मिनिटेसुद्धा घराबाहेर पडत नव्हते. ते मंत्रालयात देखील मोजून पाच वेळा गेले, सहाव्या वेळेस गेले असतील तर दाखवा आणि एक कोटी रुपये जिंका अशी ऑफर आमदार राम कदम यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Ram Kadamराम कदमBJPभाजपाShiv SenaशिवसेनाFoxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डीलGujaratगुजरातMahavikas Aghadiमहाविकास आघाडी