शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

ऐन सणासुदीत डाळी कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 2:03 AM

गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला असताना डाळी आणि कडधान्यांच्या किमती कडाडल्या आहेत.

पिंपरी : गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला असताना डाळी आणि कडधान्यांच्या किमती कडाडल्या आहेत. चणा, वाटाणा, मूग, हरबरा डाळ व मसूरच्या भावात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.श्रावण महिन्यात अनेक सणांची रेलचेल असते. त्यामुळे डाळींना मागणी वाढली आहे. त्यातच आयातीवर घालण्यात आलेली तात्पुरती बंदी यांमुळे घाऊक बाजारात कडधान्य व डाळींच्या भावात सुमारे पाच ते अठरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातच बाजारात मालाचा तुटवडा निर्माण होताच काही व्यापाºयांकडून डाळींची साठेबाजी करून नफेखोरी करण्याचे प्रकारही सर्रास सुरू आहेत. याचाही प्रतिकूल परिणाम डाळींच्या किमतीवर पाहायला मिळत आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून सणासुदीमुळे कडधान्य व डाळीला मोठी मागणी वाढली आहे. तसेच आयातीत डाळींवर बंदी घालण्यात आली. परिणामी आठवडाभरातच डाळी व कडधान्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात ५३०० ते ५५०० रुपये प्रति क्विंटल भावाने विकली जाणारी तूरडाळ आज ६६०० ते ७१०० रुपये क्विंटल इतकी झाली आहे. मूगडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ, चणाडाळ यांच्या भावातही क्विंटलमागे पाचशे ते सातशे रुपयांनी वाढ झाली आहे. डाळींप्रमाणेच कडधान्यांच्या भावातही वाढ झाली आहे. ५५०० ते ५७०० रुपये क्विंटल भावाने मिळणाºया मुगाचा दर सध्या ६६०० ते ६७०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. त्याचप्रमाणे चणा, वाटाणा, मसूर, घेवडा, हुलगा, चवळी आदींच्या भावातही क्विंटलमागे दोनशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे.>व्यापाºयांकडून साठेबाजीवास्तविक बाजारात मुबलक प्रमाणात माल असताना भाववाढ करण्याचे काहीही कारण नाही. मात्र, व्यापारी हवामान, आवक आणि मागणी याचा अंदाज घेऊन मोठ्या प्रमाणात साठेबाजी करतात. त्यामुळे मागणी वाढताच चढ्या भावाने मालाची विक्री करून मोठ्या प्रमाणात नफा कमवता येतो. व्यापाºयांच्या अशा कुटनीतीमुळे सामान्य नागरिकांना मात्र सणवार साजरे करताना काही प्रमाणात का होईना, हात आखडता घ्यावा लागत आहे. अन्न आणि औैषध प्रशासनाने अशाप्रकारे नफेखोरी करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.