शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सरकारची धोरणे उद्योगांसाठी! राज्यात हायड्रोजन, आयटी आणि वाईन पॉलिसी आणणार-उदय सामंत

By विश्वास मोरे | Updated: November 7, 2022 18:22 IST

उद्योग आणि उद्योजकांचे गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडविले जातील

पिंपरी : उद्योगांना पूरक असे धोरण राज्य सरकारचे आहे. राज्यात लवकरच हायड्रोजन, आयटी आणि वाईन पॉलिसी तयार केली जाणार आहे. याबाबत येत्या दोन ते तीन महिन्यात सकारात्मक परिणाम दिसतील. उद्योग आणि उद्योजकांचे गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन अशी माहिती उद्योगमंत्रीउदय सामंत यांनी चिंचवड येथे सोमवारी दिले. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर (एमसीसीआयए) च्या पुणे मॅन्युफॅक्चरिंग अँड डिफ्टेक एक्स्पोचे आयोजन केले आहे. त्यात उद्योगमंत्री सामंत सहभागी झाले होते. 

सामंत म्हणाले, ‘‘पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. आता ऑटो, उद्योगांचीही पंढरी होत आहे. उद्योगाच्या कोणत्याही क्षेत्रातील शाश्वत वाढीसाठी सरकार आणि उद्योग यांच्यात निरोगी संवाद आवश्यक आहे. सरकारची धोरणे ही उद्योगांसाठी आहे. राज्यातील हायड्रोजन पॉलिसी, आयटी पॉलिसी आणि वाईन पॉलिसी यासारख्या प्रलंबित धोरणे येत्या तीन ते चार महिन्यांत तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल.’’

उद्योगांना पूरक असे धोरण राबविणार

सामंत म्हणाले, ‘‘एमआयडीसीचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी एमआयडीसींना भेट देत आहेत. उद्योगवाढीसाठी आवश्यक असणारी धोरणे, जाचक नियम बदलण्याचा प्रयत्न आणि अधिकाधिक गुंतवणूक, रोजगार उपलब्ध होतील, असे धोरण राबविणार आहे. नर्सरी व्यवसाय आणि फ्लोरीक्लर वाढीसाठी जाचक असणारे नियम शिथील केले जाणार आहेत. ’’

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रUday Samantउदय सामंतbusinessव्यवसायministerमंत्री