शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामावरून सावकाश अन् सुरक्षित जा घरी; अति घाईने उगाचच जीव जाईल रस्त्यावरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 17:20 IST

सायंकाळी वाहन चालविताना चालकांनी खबरदारी घ्यावी...

-नारायण बडगुजर

पिंपरी : कामावरून सुट्टी झाल्यानंतर सायंकाळी घरी जाण्यासाठी प्रत्येकजण घाई करतात. मात्र, हीच घाई जीवावर बेतत असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत ४७४ रस्ते अपघात झाले. त्यातील सर्वाधिक १६० अपघात सायंकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत झाले. यात सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत ४१ जणांनी जीव गमावला. त्यामुळे सायंकाळी वाहन चालविताना चालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्ते अपघात कमी करण्यासाठी विविध संस्था, प्रशासन यांच्या सहकार्याने विविध उपाययोजना करण्यावर पोलिसांचा भर आहे. त्यासाठी अपघातांची कारणे, ठिकाणे आणि वेळ याबाबत सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. पहाटे, सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्री कोणत्या वेळेत किती अपघात होतात याची नोंद करून त्यानुसार अपघात टाळण्याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मध्यरात्री अपघात कमी

रात्री बारा ते पहाटे तीन या वेळेत रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होते. परिणामी अपघात कमी होतात. यावेळेत सात महिन्यांत एकूण ४१ अपघात झाले. त्यात प्राणांतिक नऊ अपघात झाल्याची नोंद आहे. पहाटे तीन ते सकाळी सहा या वेळेत एकूण ३७ अपघात झाले. त्यात प्राणांतिक १७ अपघातांची नोंद आहे.

‘त्या’ अपघातांमध्ये ४१ जणांनी गमावला जीव

सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत झालेल्या ८० अपघातांमध्ये ४१ जणांना जीव गमवावा लागला. तर ४१ जण गंभीर जखमी झाले. तसेच सात जणांना किरकोळ दुखापत झाली. रात्री नऊ ते बारा या वेळेत झालेल्या ८० अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला. तर ६० जण गंभीर जखमी झाले. तसेच ११ जणांना किरकोळ दुखापत झाली.

एका डुलकीमुळे होतो घात...

पहाटेच्या वेळेत झोप अनावर होते. असे असतानाही चालक वाहने दामटतात. यातून त्यांना डुलकी लागून अपघात होतात. यात जीवित हानी देखील होते. महामार्गांवर लांब पल्ल्यांच्या वाहनांना अशा प्रकारे अपघात होण्याचे प्रकार जास्त आहेत. तसेच सायंकाळी काम संपवून घरी जाण्याची घाई असलेल्या वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. यात वाहतूक कोंडी होणे, वाहतुकीचा वेग मंदावणे असे प्रकार होतात. तसेच अपघातही होतात.

कामावरून घरी जाण्याची घाई करताना अनेकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. सायंकाळी सहा नंतर रस्त्यावर मोठी वर्दळ असते. असे असतानाही काही दुचाकीस्वार चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करतात. त्यामुळे अपघात होतात. वाहनचालकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे.

- दीपक साळुंके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी वाहतूक विभाग

जानेवारी ते जुलै २०२२ दरम्यान झालेले अपघात

वेळ - अपघात - मृत संख्या - गंभीर जखमी संख्या - किरकोळ दुखापतसकाळी सहा ते नऊ - ५५ - १३ - ३६ - ९सकाळी नऊ ते दुपारी १२ - ५५ - २२ - ३० - १०दुपारी बारा ते तीन - ५६ - २१ - ३१ - ६दुपारी तीन ते सायंकाळी सहा - ६८ - २६ - ४९ - १२सायंकाळी सहा ते रात्री नऊ - ८० - ४१ - ४१ - ७रात्री नऊ ते १२ - ८० - २७ - ६० - ११रात्री १२ ते पहाटे तीन - ४१ - ९ - २७ - ६पहाटे तीन ते सकाळी सकाळी सहा - ३७ - १७ - २० - ८

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात