शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

कामावरून सावकाश अन् सुरक्षित जा घरी; अति घाईने उगाचच जीव जाईल रस्त्यावरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 17:20 IST

सायंकाळी वाहन चालविताना चालकांनी खबरदारी घ्यावी...

-नारायण बडगुजर

पिंपरी : कामावरून सुट्टी झाल्यानंतर सायंकाळी घरी जाण्यासाठी प्रत्येकजण घाई करतात. मात्र, हीच घाई जीवावर बेतत असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत ४७४ रस्ते अपघात झाले. त्यातील सर्वाधिक १६० अपघात सायंकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत झाले. यात सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत ४१ जणांनी जीव गमावला. त्यामुळे सायंकाळी वाहन चालविताना चालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्ते अपघात कमी करण्यासाठी विविध संस्था, प्रशासन यांच्या सहकार्याने विविध उपाययोजना करण्यावर पोलिसांचा भर आहे. त्यासाठी अपघातांची कारणे, ठिकाणे आणि वेळ याबाबत सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. पहाटे, सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्री कोणत्या वेळेत किती अपघात होतात याची नोंद करून त्यानुसार अपघात टाळण्याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मध्यरात्री अपघात कमी

रात्री बारा ते पहाटे तीन या वेळेत रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होते. परिणामी अपघात कमी होतात. यावेळेत सात महिन्यांत एकूण ४१ अपघात झाले. त्यात प्राणांतिक नऊ अपघात झाल्याची नोंद आहे. पहाटे तीन ते सकाळी सहा या वेळेत एकूण ३७ अपघात झाले. त्यात प्राणांतिक १७ अपघातांची नोंद आहे.

‘त्या’ अपघातांमध्ये ४१ जणांनी गमावला जीव

सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत झालेल्या ८० अपघातांमध्ये ४१ जणांना जीव गमवावा लागला. तर ४१ जण गंभीर जखमी झाले. तसेच सात जणांना किरकोळ दुखापत झाली. रात्री नऊ ते बारा या वेळेत झालेल्या ८० अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला. तर ६० जण गंभीर जखमी झाले. तसेच ११ जणांना किरकोळ दुखापत झाली.

एका डुलकीमुळे होतो घात...

पहाटेच्या वेळेत झोप अनावर होते. असे असतानाही चालक वाहने दामटतात. यातून त्यांना डुलकी लागून अपघात होतात. यात जीवित हानी देखील होते. महामार्गांवर लांब पल्ल्यांच्या वाहनांना अशा प्रकारे अपघात होण्याचे प्रकार जास्त आहेत. तसेच सायंकाळी काम संपवून घरी जाण्याची घाई असलेल्या वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. यात वाहतूक कोंडी होणे, वाहतुकीचा वेग मंदावणे असे प्रकार होतात. तसेच अपघातही होतात.

कामावरून घरी जाण्याची घाई करताना अनेकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. सायंकाळी सहा नंतर रस्त्यावर मोठी वर्दळ असते. असे असतानाही काही दुचाकीस्वार चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करतात. त्यामुळे अपघात होतात. वाहनचालकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे.

- दीपक साळुंके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी वाहतूक विभाग

जानेवारी ते जुलै २०२२ दरम्यान झालेले अपघात

वेळ - अपघात - मृत संख्या - गंभीर जखमी संख्या - किरकोळ दुखापतसकाळी सहा ते नऊ - ५५ - १३ - ३६ - ९सकाळी नऊ ते दुपारी १२ - ५५ - २२ - ३० - १०दुपारी बारा ते तीन - ५६ - २१ - ३१ - ६दुपारी तीन ते सायंकाळी सहा - ६८ - २६ - ४९ - १२सायंकाळी सहा ते रात्री नऊ - ८० - ४१ - ४१ - ७रात्री नऊ ते १२ - ८० - २७ - ६० - ११रात्री १२ ते पहाटे तीन - ४१ - ९ - २७ - ६पहाटे तीन ते सकाळी सकाळी सहा - ३७ - १७ - २० - ८

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात