शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

कामावरून सावकाश अन् सुरक्षित जा घरी; अति घाईने उगाचच जीव जाईल रस्त्यावरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 17:20 IST

सायंकाळी वाहन चालविताना चालकांनी खबरदारी घ्यावी...

-नारायण बडगुजर

पिंपरी : कामावरून सुट्टी झाल्यानंतर सायंकाळी घरी जाण्यासाठी प्रत्येकजण घाई करतात. मात्र, हीच घाई जीवावर बेतत असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत ४७४ रस्ते अपघात झाले. त्यातील सर्वाधिक १६० अपघात सायंकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत झाले. यात सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत ४१ जणांनी जीव गमावला. त्यामुळे सायंकाळी वाहन चालविताना चालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्ते अपघात कमी करण्यासाठी विविध संस्था, प्रशासन यांच्या सहकार्याने विविध उपाययोजना करण्यावर पोलिसांचा भर आहे. त्यासाठी अपघातांची कारणे, ठिकाणे आणि वेळ याबाबत सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. पहाटे, सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्री कोणत्या वेळेत किती अपघात होतात याची नोंद करून त्यानुसार अपघात टाळण्याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मध्यरात्री अपघात कमी

रात्री बारा ते पहाटे तीन या वेळेत रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होते. परिणामी अपघात कमी होतात. यावेळेत सात महिन्यांत एकूण ४१ अपघात झाले. त्यात प्राणांतिक नऊ अपघात झाल्याची नोंद आहे. पहाटे तीन ते सकाळी सहा या वेळेत एकूण ३७ अपघात झाले. त्यात प्राणांतिक १७ अपघातांची नोंद आहे.

‘त्या’ अपघातांमध्ये ४१ जणांनी गमावला जीव

सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत झालेल्या ८० अपघातांमध्ये ४१ जणांना जीव गमवावा लागला. तर ४१ जण गंभीर जखमी झाले. तसेच सात जणांना किरकोळ दुखापत झाली. रात्री नऊ ते बारा या वेळेत झालेल्या ८० अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला. तर ६० जण गंभीर जखमी झाले. तसेच ११ जणांना किरकोळ दुखापत झाली.

एका डुलकीमुळे होतो घात...

पहाटेच्या वेळेत झोप अनावर होते. असे असतानाही चालक वाहने दामटतात. यातून त्यांना डुलकी लागून अपघात होतात. यात जीवित हानी देखील होते. महामार्गांवर लांब पल्ल्यांच्या वाहनांना अशा प्रकारे अपघात होण्याचे प्रकार जास्त आहेत. तसेच सायंकाळी काम संपवून घरी जाण्याची घाई असलेल्या वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. यात वाहतूक कोंडी होणे, वाहतुकीचा वेग मंदावणे असे प्रकार होतात. तसेच अपघातही होतात.

कामावरून घरी जाण्याची घाई करताना अनेकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. सायंकाळी सहा नंतर रस्त्यावर मोठी वर्दळ असते. असे असतानाही काही दुचाकीस्वार चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करतात. त्यामुळे अपघात होतात. वाहनचालकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे.

- दीपक साळुंके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी वाहतूक विभाग

जानेवारी ते जुलै २०२२ दरम्यान झालेले अपघात

वेळ - अपघात - मृत संख्या - गंभीर जखमी संख्या - किरकोळ दुखापतसकाळी सहा ते नऊ - ५५ - १३ - ३६ - ९सकाळी नऊ ते दुपारी १२ - ५५ - २२ - ३० - १०दुपारी बारा ते तीन - ५६ - २१ - ३१ - ६दुपारी तीन ते सायंकाळी सहा - ६८ - २६ - ४९ - १२सायंकाळी सहा ते रात्री नऊ - ८० - ४१ - ४१ - ७रात्री नऊ ते १२ - ८० - २७ - ६० - ११रात्री १२ ते पहाटे तीन - ४१ - ९ - २७ - ६पहाटे तीन ते सकाळी सकाळी सहा - ३७ - १७ - २० - ८

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात