शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

शिक्षण सम्राट म्हणने चुकीचे - गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 02:11 IST

शिक्षणात महर्षी, ऋषी असतात. शिक्षकांनी आयुष्यभर काम केलेले असते. त्यांच्या कामातून हजारो विद्यार्थी घडतात. त्यामुळे शिक्षणात सम्राट शब्द वापरण्याची संकल्पना अतिशय चुकीची आहे़ शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नाही.

पिंपरी - शिक्षणात महर्षी, ऋषी असतात. शिक्षकांनी आयुष्यभर काम केलेले असते. त्यांच्या कामातून हजारो विद्यार्थी घडतात. त्यामुळे शिक्षणात सम्राट शब्द वापरण्याची संकल्पना अतिशय चुकीची आहे़ शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नाही. शिक्षण हा पेशा आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात महापालिकेच्या वतीने गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा पुरस्काराचे वितरण झाले. त्या वेळी बापट बोलत होते. महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिवखाडे, सभागृह नेते एकनाथ पवार, शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिलाबाबर, सदस्या विनया तापकीर, अश्विनी चिंचवडे, उषा काळे, राजू बनसोडे, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे, सुवर्णा बर्डे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे उपस्थित होत्या.आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘शिक्षक गुणवंत कसा ठरवायचा हा मोठा प्रश्नच आहे़ कारण प्रत्येक शिक्षक हा गुणवंतच असतो. गुरू हे श्रेष्ठच असतात. शिक्षक समाजाबरोबर राहतो. प्रत्येक घटकाला बरोबर घेतो. महापालिकेच्या शाळेतील गुणवत्ता वाढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देशाचे भवितव्य घडविणारे विद्यार्थी महापालिका शाळेतून निर्माण व्हावेत. तसेच गुणवंत शिक्षकांची निवड करण्यासाठीच्या समितीत तज्ज्ञांची निवड करावी.’’महापौर जाधव म्हणाले,‘‘पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी आहे. पालिकेच्या शाळेत या नगरीतील कष्टकऱ्यांची मुले शिकतात. पालिका शाळेतील मुलांचा माध्यमातून शहराचे नाव व्हावे.’’प्रास्ताविक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले.भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगली संस्कृती असून, त्याचे मूळ शिक्षकांपर्यंत जाते. शिक्षकांमुळेच संस्कृती वाढते, हे नम्रपणे मान्य करणे गरजेचे आहे. शिक्षकांमुळेच मी यापदापर्यंत पोहोचलो. शिक्षक कधीच पुढारी झाला नाही. शिक्षकाने अनेक नेते घडविले. डॉक्टर, अभियंते, वकील निर्माण केले. शिक्षक विद्यार्थ्यांना आपली संपत्ती मानतात. शिक्षकांमुळेच आपणाला दिशा मिळते. शिक्षकांमुळेच संस्कृती वाढते, हे नम्रपणे मान्य करणे गरजेचे आहे. माणसाचे वेतनावर मूल्यमापन ठरत नाही. शिक्षणावर त्याचे मूल्यमापन ठरविले जाते. शिक्षणाला सरकारने प्राधान्य दिले आहे. - गिरीश बापट, पालकमंत्री

टॅग्स :Educationशिक्षणnewsबातम्या