शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

शिक्षण सम्राट म्हणने चुकीचे - गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 02:11 IST

शिक्षणात महर्षी, ऋषी असतात. शिक्षकांनी आयुष्यभर काम केलेले असते. त्यांच्या कामातून हजारो विद्यार्थी घडतात. त्यामुळे शिक्षणात सम्राट शब्द वापरण्याची संकल्पना अतिशय चुकीची आहे़ शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नाही.

पिंपरी - शिक्षणात महर्षी, ऋषी असतात. शिक्षकांनी आयुष्यभर काम केलेले असते. त्यांच्या कामातून हजारो विद्यार्थी घडतात. त्यामुळे शिक्षणात सम्राट शब्द वापरण्याची संकल्पना अतिशय चुकीची आहे़ शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नाही. शिक्षण हा पेशा आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात महापालिकेच्या वतीने गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा पुरस्काराचे वितरण झाले. त्या वेळी बापट बोलत होते. महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिवखाडे, सभागृह नेते एकनाथ पवार, शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिलाबाबर, सदस्या विनया तापकीर, अश्विनी चिंचवडे, उषा काळे, राजू बनसोडे, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे, सुवर्णा बर्डे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे उपस्थित होत्या.आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘शिक्षक गुणवंत कसा ठरवायचा हा मोठा प्रश्नच आहे़ कारण प्रत्येक शिक्षक हा गुणवंतच असतो. गुरू हे श्रेष्ठच असतात. शिक्षक समाजाबरोबर राहतो. प्रत्येक घटकाला बरोबर घेतो. महापालिकेच्या शाळेतील गुणवत्ता वाढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देशाचे भवितव्य घडविणारे विद्यार्थी महापालिका शाळेतून निर्माण व्हावेत. तसेच गुणवंत शिक्षकांची निवड करण्यासाठीच्या समितीत तज्ज्ञांची निवड करावी.’’महापौर जाधव म्हणाले,‘‘पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी आहे. पालिकेच्या शाळेत या नगरीतील कष्टकऱ्यांची मुले शिकतात. पालिका शाळेतील मुलांचा माध्यमातून शहराचे नाव व्हावे.’’प्रास्ताविक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले.भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगली संस्कृती असून, त्याचे मूळ शिक्षकांपर्यंत जाते. शिक्षकांमुळेच संस्कृती वाढते, हे नम्रपणे मान्य करणे गरजेचे आहे. शिक्षकांमुळेच मी यापदापर्यंत पोहोचलो. शिक्षक कधीच पुढारी झाला नाही. शिक्षकाने अनेक नेते घडविले. डॉक्टर, अभियंते, वकील निर्माण केले. शिक्षक विद्यार्थ्यांना आपली संपत्ती मानतात. शिक्षकांमुळेच आपणाला दिशा मिळते. शिक्षकांमुळेच संस्कृती वाढते, हे नम्रपणे मान्य करणे गरजेचे आहे. माणसाचे वेतनावर मूल्यमापन ठरत नाही. शिक्षणावर त्याचे मूल्यमापन ठरविले जाते. शिक्षणाला सरकारने प्राधान्य दिले आहे. - गिरीश बापट, पालकमंत्री

टॅग्स :Educationशिक्षणnewsबातम्या