शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गजबजतोय देहूगावचा मजूर अड्डा, ठेकेदार, कामगारांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 03:06 IST

येथील प्रवेशद्वार कमान बांधकाम कारागिरांचा व बिगारी कामगार, मजुरांचा अड्डा ठरत असून, परिसरातील बांधकामासाठी मोठ्या संख्येने सहज मजूर मिळत असल्याने परिसरातील ठेकेदारांची मजूर सांभाळण्याची व कामगार शोधण्याचा त्रास कमी झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव : येथील प्रवेशद्वार कमान बांधकाम कारागिरांचा व बिगारी कामगार, मजुरांचा अड्डा ठरत असून, परिसरातील बांधकामासाठी मोठ्या संख्येने सहज मजूर मिळत असल्याने परिसरातील ठेकेदारांची मजूर सांभाळण्याची व कामगार शोधण्याचा त्रास कमी झाला आहे. काही प्रमाणात पैशांची बचतही होत आहे.देहूगाव हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असले तरी सध्या पिंपरी-चिंचवडच्या जवळ असल्याने सर्र्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याने वेगाने विस्तारत आहे. नोकरी, व्यवसाय, आरोग्य, शिक्षणाच्या बहुतेक सर्वच सोयी अवघ्या काही किलोमीटर अंतरावर उपलब्ध होत आहेत. शासनाकडून गावात अनेक विकासकामे झाली आहेत. दळणवळणाच्याही सोयी उपलब्ध असल्याने शहरात महागडी सदनिका खरेदी करण्यापेक्षा येथे स्वत:ची जागा घेऊन टुमदार घर बांधण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे. येथे अनेक गृहसंकुलांचे काम सुरू असून शहरापेक्षा खूप किमतीत सदनिका उपलब्ध होत आहेत. त्यामुळे येथील जागेला चांगली मागणी वाढली असून, तेथे बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहे. या परिस्थितीमुळे विकसनशील देहूगावात मध्यमवर्गीय व कामगार क्षेत्रातील कामगार येथे घरास प्राधान्य देऊ लागले आहेत.बांधकाम क्षेत्रासाठी कामासाठी स्थानिक कामगार कमी पडत असल्याने आणि येथे रोजगार चांगला उपलब्ध होत असल्याने येथे राज्यातील औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांसह देशातील मध्य प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालमधील बांधकाम क्षेत्रातील गवंडी कारागीर व त्यांच्या हाताखाली काम करणारे सुमारे ३०० ते ४०० मजूर येथे रोज सकाळी आठ ते दुपारी बारा दरम्यान आपले टिकाव, फावडी, घमेली यांच्यासह थापी, रंधा असे साहित्य घेऊन येथील प्रवेशद्वार कमानीजवळ येऊन उभे राहतात. ठेकेदार आपणास आवश्यक त्या लोकांची निवड करून रोजगार ठरवून घेऊन वाहनातून घेऊन जातात. जर काम मिळाले तर कामावर जायचे, नाहीतर घरी जायचे असा येथील या कामगारांचा शिरस्ता झाला आहे. सध्या देहूगाव परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे कामगारांना चांगलीच मागणी असल्याने येथे दिवसेंदिवस कामगारांची गर्दीदेखील चांगलीच वाढत आहे. त्यामुळे सकाळी दहाच्या सुमारास ठेकेदार व कारागीर आणि मजुरांच्या रोजगारासाठी संबंधितांशी बोली होताना पहायला मिळते. यामुळे वाहनांची चांगलीच गर्दी होते. या गर्दीमुळे चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथून आळंदी आणि देहूरोडकडे रस्ते जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा थांबविण्यासाठी हे कामगार रस्त्याच्या कडेला कमानीखाली मोकळ्या जागेत थांबतात. मात्र, वाहनचालक हे गर्दी पाहून वेग कमी करतात व वहातुकीची गती मंदावते परिणामी वहातुकीचा खोळंबा होत जात आहे.कामाची आशा : काही जणांकडून फसवणूकयेथील मजूर अड्ड्यावरील कामगार सुभाष लष्करे म्हणाले की, येथे देशाच्या आणि राज्याच्या विविध भागांतून कामगार आलेले असून, सकाळी आठ वाजल्यापासून काम मिळेल या आशेवर उभा राहतो, काम मिळाले तर कामावर जायचे नाहीतर घरी जायचे. गवंड्यासाठी ५०० ते ६०० रुपये रोज व बिगारी पुरुषासाठी ४०० रुपये, महिला बिगारीसाठी २०० ते ३०० रुपये रोज मिळतो. काम झाल्यावर लगेच पैसे घेतले जातात.मात्र, काम जास्त असेल तर कामाच्या प्रमाणात विश्वासावर दोन तीन दिवस कामगार थांबतात. काही लोक काम संपत आले की सुटी होण्याच्या वेळी पैसे देण्यास टाळा टाळ करतात व भ्रमणध्वनी बंद ठेवतात. रोज नाही मिळाला तर बहुतांशी मजुराच्या घरची चूल पेटणे अवघड होते. काही लोक काम करून घेतात व पैसे बुडवितात. हाही अनुभव आल्याचे लष्करे यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे