शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पुणे-नाशिक रेल्वेसाठी एमआरआयडीसी कंपनीची स्थापना, खासदार शिवाजीराव आढळराव यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 15:52 IST

पुणे-नाशिक या नवीन रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआयडीसी) या कंपनीची निर्मिती करण्यात आली असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मान्यतेसाठी नीती आयोगाकडे गेला आहे.

- हनुमंत देवकर चाकण - पुणे-नाशिक या नवीन रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआयडीसी) या कंपनीची निर्मिती करण्यात आली असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मान्यतेसाठी नीती आयोगाकडे गेला आहे. नीती आयोगाची मान्यता मिळताच एमआयआरडीसीच्या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. सुरुवातीला ९०० कोटींच्या या प्रकल्पाची किंमत वाढून ती २४२५ कोटींवर गेली होती. मात्र आता या प्रकल्पासाठी ५५०० कोटींच्या आसपास खर्च येणार असून त्यापैकी सुमारे १२०० कोटी हे केवळ भूसंपादनासाठी खर्च होणार आहेत. तर रेल्वेमार्ग जाणारी जमीन ही दरी-डोंगरातून जात असल्याने तेथील जमीन सपाटीकरणाच्या कामांना सुमारे १२०० कोटी खर्च येणार आहे, तर उर्वरीत रक्कम प्रत्यक्ष रेल्वेलाईन, स्टेशन आदींसाठी खर्च होणार असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उपमुख्य अभियंता गुप्ता यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज उपमुख्य अभियंता, मध्य रेल्वे, पुणे विभाग यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत रेल्वेमार्गाचा नकाशा, संभाव्य रेल्वे स्थानके ( स्टेशन्स ), भूसंपादनासाठी लागणारे क्षेत्र आणि रेल्वेमार्ग जात असलेल्या गावांच्या माहितीचे सादरीकरण उपमुख्य अभियंता गुप्ता यांनी केले. या रेल्वेमार्गावर एकूण ११ बोगदे बांधण्यात येणार असून त्यांची एकत्रित लांबी १३.१२७ कि.मी. इतकी असणार आहे. यापैकी सर्वांत मोठा ६ कि.मी. लांबीचा बोगदा पापळवाडी (ता. खेड) ते वाळुंजवाडी (ता. आंबेगाव) दरम्यान बांधण्यात येणार असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. पाचशे कोटींपेक्षा जास्त रकमेच्या प्रकल्पांना नीती आयोगाची मान्यता आवश्यक असल्याने सध्या हा प्रकल्प नीती आयोगाकडे मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकार या रेल्वेमार्गासाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के वाट उचलणार असून या रेल्वे मार्गासाठी स्थापन केलेल्या एमआरआयडीसी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती झाली असून या अधिकाऱ्यास रेल्वे पदमुक्त केल्यानंतर ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यानंतर प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया होईल. त्यानंतर पुन्हा एकदा भौगोलिक सर्व्हेक्षण करण्यात येऊन भूसंपादनाचे प्रत्यक्ष क्षेत्र निश्चित होऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात येईल असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची उभारणी होणे हे आपण पाहिलेले एक स्वप्न होते आणि ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असले तरी त्यासाठी मी लढलेली लढाई, केलेला संघर्ष हा अविस्मरणीय आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी पुढील काळात मलाच लक्ष ठेवून प्रयत्न करावे लागणार आहेत. हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे काम माझ्या राजकीय कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरेल असा आशावाद खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेPuneपुणेNashikनाशिकShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव