शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी झाडांच्या मोहापायी चैत्रपालवीचा विसर

By admin | Updated: April 28, 2017 05:43 IST

आपल्या वातावरणाचा अविभाज्य भाग असणाऱ्या देशी झाडांवर सध्या चैत्रपालवीचा सोहळा साजरा होत आहे. या दिवसांमध्ये देशी झाडांना नविन पालवी

रविकिरण सासवडे / बारामतीआपल्या वातावरणाचा अविभाज्य भाग असणाऱ्या देशी झाडांवर सध्या चैत्रपालवीचा सोहळा साजरा होत आहे. या दिवसांमध्ये देशी झाडांना नविन पालवी, मोहोर येतो. सहाजिकच रणरणत्या उन्हात सुद्धा देशी झाडे हिरवीगार अणि भरगच्च दिसतात. मात्र मागील काही वर्षांपासून परदेशी दिखाऊ झाडांच्या मोहापायी देशी झाडांकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्याचे परिणाम येथील वातारणावर होऊ लागले आहेत. परदेशी झाडांच्या मोहापायी चैत्रपालवीचा विसर पडू नये असे म्हनण्याची वेळ आली, त्यामुळे पुन्हा देशी झाडांच्या संवर्धनाची व संगोपनाची गरज निर्माण झाली आहे. पर्यावरण प्रेमींनी पाठपुरावा केल्यामुळे आता देशी झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची मोहीम बारामती मध्ये सुरू केली आहे.देशी झाडांमुळे तापमान देखील कमी होते. उन्हाळ््याच्या सुरूवातीला फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून ते अगदी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशी झाडे जिर्ण पाने सोडून नवपालवी धारण करतात. वड , पिंपळ, चिंच, फणस, आवळा, आंबा ,बेल, कडुनिंब, मोह, कदंब, पळस आदी देशी झाडे हिरवीगार होतात. भर उन्हाळ््यात या झाडांच्या बहरण्यामुळे त्या त्या परिसरात गारवा निर्माण होतो. तसेच पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर देशी झाडे फळ तयार करतात. उन्हाळ््यात पाण्याअभावी पशू-पक्षांच्या आहाराची देखील व्यवस्था देशी झाडांमुळेच होते. प्राण्यांमुळे फळांच्या बिया जागोजागी विखुरल्या जातात. पावसाळ््यात या बिया रूजतात. नविन झाडे जन्म घेतात. आपल्या परिसरातील हे निसर्गचक्र अव्याहतपणे सुरू आहे. मात्र मागील काही वर्षांपासून शहरी आणि ग्रामीण भागात देखील हे चित्र बदलत आहे. कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, स्पॅथोडिया, रेन ट्री या परदेशी दिखाऊ झाडांच्या मोहाला बळी पडून अनेक शाळा, तसेच सार्वजनिक ठिकाणी तसेच नवविभागात देखील परदेशी झाडांच्या लागवडी झाल्या. भर उन्हात सावली देण्याऐवजी या परदेशी झाडांची पानझड होऊन ही झाडे अगदी निष्पर्ण होतात. शस्त्रीय दृष्ट्यादेखील अपल्या वातावरणाशी परदेशी झाडे योग्या नसल्याचे अनेक पर्यावरण प्रेमींनी वेळोवेळी सप्रमाण दाखवून दिले आहे. मात्र तरिही अज्ञाना अभावी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये परदेशी झाडांचेच वृक्षारोपन घेतले जाते. काही पर्यावरण प्रेमींमुळे आता सजगता येऊ लागली आहे. त्यामुळे ठराविक रोपवाटिकांमधून देशी झाडांची देखील रोपे मिळू लागील आहेत. वड, पिंपळ, आंबा, चिंच यांसारख्या मोठ्या देशी झाडांमुळे आद्रतेचे प्रमाण वाढले जाते. साहजिकच या पावसाळ््यात येणाऱ्या मान्सुन वाऱ्यापासून पाऊस पाडण्यासाठी आपल्या देशी झाडांनी तयार केलेली आद्रता महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र परदेशी झाडांचा सोस, देशी झाडांची होणारी मोठ्या प्रमाणावर कत्तल, वनविभागांमधून झालेली परदेशी झाडांच्या लागवडी यामुळे येथील जमिनीचे तापमानदेखील वाढू लागले. साहजिकच देशी झाडांच्या कमतरतेमुळे आद्रतादेखील कमी होऊ लागली. त्याचा परिणाम येथील कमी होणाऱ्या पाऊसकाळावर तसेच वाढणाऱ्या तापमानामुळे दिसून येऊ लागले आहे. वनविभागामध्ये देशी झाडांचे व्यवस्थित वृक्षारोपण होऊन त्याची योग्य राखली गेल्यास आपली मरणासन्न असणारी वने हिरवीगार होण्यास मदत होईल. तसेच देशी झाडांच्या फळांमुळे भर उन्हाळ््यातही चिंकारा, ससे, विविध शाकाहारी पशू-पक्षी यांच्या आहाराचा प्रश्न सुटण्यास काहीप्रमाणात मदत होणार आहे. तसेच चाराटंचाईच्या काळात मानवीवस्तीकडे होणारे वन्यजीवांचे स्थलांतर कमी होईल. येथील कऱ्हानदी काठच्या परिसरात देशी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची मोहीम सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांंनी सुरू केली आहे. नदीकाठावर पिंपळ, वड, आंबा, जांभूळ, चिंच, कडूलिंब आदी झाडांचे रोपन केले. येत्या काही वर्षात नदीकाठ हिरवागार दिसणार आहे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.