शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

परदेशी झाडांच्या मोहापायी चैत्रपालवीचा विसर

By admin | Updated: April 28, 2017 05:43 IST

आपल्या वातावरणाचा अविभाज्य भाग असणाऱ्या देशी झाडांवर सध्या चैत्रपालवीचा सोहळा साजरा होत आहे. या दिवसांमध्ये देशी झाडांना नविन पालवी

रविकिरण सासवडे / बारामतीआपल्या वातावरणाचा अविभाज्य भाग असणाऱ्या देशी झाडांवर सध्या चैत्रपालवीचा सोहळा साजरा होत आहे. या दिवसांमध्ये देशी झाडांना नविन पालवी, मोहोर येतो. सहाजिकच रणरणत्या उन्हात सुद्धा देशी झाडे हिरवीगार अणि भरगच्च दिसतात. मात्र मागील काही वर्षांपासून परदेशी दिखाऊ झाडांच्या मोहापायी देशी झाडांकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्याचे परिणाम येथील वातारणावर होऊ लागले आहेत. परदेशी झाडांच्या मोहापायी चैत्रपालवीचा विसर पडू नये असे म्हनण्याची वेळ आली, त्यामुळे पुन्हा देशी झाडांच्या संवर्धनाची व संगोपनाची गरज निर्माण झाली आहे. पर्यावरण प्रेमींनी पाठपुरावा केल्यामुळे आता देशी झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची मोहीम बारामती मध्ये सुरू केली आहे.देशी झाडांमुळे तापमान देखील कमी होते. उन्हाळ््याच्या सुरूवातीला फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून ते अगदी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशी झाडे जिर्ण पाने सोडून नवपालवी धारण करतात. वड , पिंपळ, चिंच, फणस, आवळा, आंबा ,बेल, कडुनिंब, मोह, कदंब, पळस आदी देशी झाडे हिरवीगार होतात. भर उन्हाळ््यात या झाडांच्या बहरण्यामुळे त्या त्या परिसरात गारवा निर्माण होतो. तसेच पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर देशी झाडे फळ तयार करतात. उन्हाळ््यात पाण्याअभावी पशू-पक्षांच्या आहाराची देखील व्यवस्था देशी झाडांमुळेच होते. प्राण्यांमुळे फळांच्या बिया जागोजागी विखुरल्या जातात. पावसाळ््यात या बिया रूजतात. नविन झाडे जन्म घेतात. आपल्या परिसरातील हे निसर्गचक्र अव्याहतपणे सुरू आहे. मात्र मागील काही वर्षांपासून शहरी आणि ग्रामीण भागात देखील हे चित्र बदलत आहे. कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, स्पॅथोडिया, रेन ट्री या परदेशी दिखाऊ झाडांच्या मोहाला बळी पडून अनेक शाळा, तसेच सार्वजनिक ठिकाणी तसेच नवविभागात देखील परदेशी झाडांच्या लागवडी झाल्या. भर उन्हात सावली देण्याऐवजी या परदेशी झाडांची पानझड होऊन ही झाडे अगदी निष्पर्ण होतात. शस्त्रीय दृष्ट्यादेखील अपल्या वातावरणाशी परदेशी झाडे योग्या नसल्याचे अनेक पर्यावरण प्रेमींनी वेळोवेळी सप्रमाण दाखवून दिले आहे. मात्र तरिही अज्ञाना अभावी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये परदेशी झाडांचेच वृक्षारोपन घेतले जाते. काही पर्यावरण प्रेमींमुळे आता सजगता येऊ लागली आहे. त्यामुळे ठराविक रोपवाटिकांमधून देशी झाडांची देखील रोपे मिळू लागील आहेत. वड, पिंपळ, आंबा, चिंच यांसारख्या मोठ्या देशी झाडांमुळे आद्रतेचे प्रमाण वाढले जाते. साहजिकच या पावसाळ््यात येणाऱ्या मान्सुन वाऱ्यापासून पाऊस पाडण्यासाठी आपल्या देशी झाडांनी तयार केलेली आद्रता महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र परदेशी झाडांचा सोस, देशी झाडांची होणारी मोठ्या प्रमाणावर कत्तल, वनविभागांमधून झालेली परदेशी झाडांच्या लागवडी यामुळे येथील जमिनीचे तापमानदेखील वाढू लागले. साहजिकच देशी झाडांच्या कमतरतेमुळे आद्रतादेखील कमी होऊ लागली. त्याचा परिणाम येथील कमी होणाऱ्या पाऊसकाळावर तसेच वाढणाऱ्या तापमानामुळे दिसून येऊ लागले आहे. वनविभागामध्ये देशी झाडांचे व्यवस्थित वृक्षारोपण होऊन त्याची योग्य राखली गेल्यास आपली मरणासन्न असणारी वने हिरवीगार होण्यास मदत होईल. तसेच देशी झाडांच्या फळांमुळे भर उन्हाळ््यातही चिंकारा, ससे, विविध शाकाहारी पशू-पक्षी यांच्या आहाराचा प्रश्न सुटण्यास काहीप्रमाणात मदत होणार आहे. तसेच चाराटंचाईच्या काळात मानवीवस्तीकडे होणारे वन्यजीवांचे स्थलांतर कमी होईल. येथील कऱ्हानदी काठच्या परिसरात देशी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची मोहीम सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांंनी सुरू केली आहे. नदीकाठावर पिंपळ, वड, आंबा, जांभूळ, चिंच, कडूलिंब आदी झाडांचे रोपन केले. येत्या काही वर्षात नदीकाठ हिरवागार दिसणार आहे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.