शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षा दमदार पावसाची

By admin | Updated: July 9, 2015 02:36 IST

पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळपासून किवळे, गहुंजे, सांगवडे परिसरात पावसाच्या हलक्या व तुरळक सरींनी अधूनमधून हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

किवळे : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळपासून किवळे, गहुंजे, सांगवडे परिसरात पावसाच्या हलक्या व तुरळक सरींनी अधूनमधून हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. भात व खरिपातील इतर पिकांसाठी हा पाऊस पोषक असला, तरी आणखी पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.मोठ्या विश्रांतीनंतर देहूरोड, किवळे, रावेत, मामुर्डी, गहुंजे व सांगवडे भागात बुधवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. बुधवारी सायंकाळपर्यंत पडलेल्या हलक्या पावसाने भुईमूग, कडधान्ये, भातरोपांना काहीसा दिलासा दिला आहे. मध्यंतरीच्या उघडिपीने भुईमूग, घेवडा, मूग, पावटा या पिकांची पेरणी केलेले शेतकरी चिंतेत होते. नदीच्या अगर विहिरीच्या पाण्याची सोय असलेल्या काही मोजक्या शेतकऱ्यांची भातलागवड झाली असून, पाण्याची सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील भातरोपे जळू लागली होती. हा पाऊस पिकांसाठी अनुकूल असला, तरी दमदार पाऊस आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने उशिरा भातलागवड करण्यासाठी बहुतांश शेतकरी दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भातरोपांचे नुकसानशिवणे : पवन मावळात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने काही शेतकऱ्यांचे भातरोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भातखाचरे कडक उन्हाने पार करपून गेली आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहणार आहे. नदीशेजारील शेतात शेतकऱ्यांनी मोटारीच्या साहाय्याने पाणी सोडून पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)