शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची गणिते जुळविण्यासाठी कसरत

By admin | Updated: August 8, 2015 00:34 IST

मावळ तालुक्यात ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. आॅगस्टअखेर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका होणार असल्याने

महादेव वाघमारे, वडगाव मावळमावळ तालुक्यात ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. आॅगस्टअखेर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका होणार असल्याने ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाची सत्ता आणण्यासाठी पक्षाचे राजकीय नेते ग्रामपंचायतीमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी सदस्यांचे गणित जुळविण्यासाठी कसरत करत आहेत.निवडणुका गावकी व भावकीच्या जोरावर स्थानिक पॅनलच्या वतीने निवडणुका लढविल्या गेल्या. यात कोणत्याही उमेदवाराने राजकीय पक्षाच्या चिन्हावर ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या नाही. तरी, पक्षाचे राजकीय नेते मावळ तालुक्यात आमच्या पक्षाचे उमेदवार सर्वाधिक निवडून आले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुका भवितव्य ग्रामपंचायतीवरील वर्चस्वावर असते. ग्रामपंचायतीवर सत्ता कायम राहण्यासाठी आजी-माजी सदस्यांनी आरक्षण जागेचा विचार करता त्यांच्याच घरातील उमेदवार निवडून आणले आहे. केवळ सरपंच व उपसरपंचपद मिळविण्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी माजी सदस्य व राजकीय नेते प्रत्येक सदस्याला पदाचे व पैशाचे आमिष दाखवून पाठिंबा मिळवत आहेत. काही ग्रामपंचायतींत सत्ता काबीज करण्यासाठी एकाच सदस्याची आवश्यकता आहे. अशा ग्रामपंचायतींच्या सदस्याला पद व मोठ्या रकमेचे आमिष दिले जात आहे. काही राजकीय नेत्यांनी अशा महत्त्वाच्या सदस्याला काबीज करून त्यांना अनाथ स्थळी ठेवल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या अगोदर २४ तास मोबाईल चालू ठेवणारे व मतदाराला सतत दर्शन देणाऱ्या उमेदवारांचे मतमोजणीनंतर फोन बंद असून, त्यांचा शोध मतदार घेत आहे. कुणबीच्या दाखल्याने ओबीसी जागांवर आजी-माजी सदस्यांच्या महिला व मुलांची बाजी असून, ५० टक्के महिलाराज व तरुणाईचा सहभाग वाढल्याने ग्रामपंचायती निवडणुकीत चैतन्य आल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी घराणेशाही सुरू असल्याचे दिसत आहे.निवडणुकीत आश्वासन देणारे विजयी उमेदवार निवडणूक संपल्यावर ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. बहुमताचे गणित जुळविताना विजयी सदस्य मिळत नसल्याने त्या सदस्यांच्या नातेवाइकाच्या घरी राजकीय नेते चकरा मारत असून, तेथे नसल्याचे समजल्यास राजकीय नेते निराश होत आहेत. सत्ता आमची असल्याचा दावा करणाऱ्या काही नेत्यांच्या हातून सत्ता बहुमताचे गणित न जुळल्याने हातून निसटत आहेत. सरपंच व उपसरपंच निवडणुकीपर्यंत विजयी सदस्यांची मनधरणी करताना नेत्यांना कसरत करावी लागत आहे.विजयी सदस्याचा काही तास फोन बंद असल्यास नेते त्याच्या घरी पोहोचत आहेत. त्यास कोणी आमिष दाखवून परिवर्तन करणार नाही, यासाठी पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.