शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही केवळ न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे का? श्रीपाल सबनीस यांचा सवाल

By नारायण बडगुजर | Updated: April 9, 2023 16:37 IST

भारताच्या लोकशाहीला आधार वाटावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात आहे

पिंपरी : राजकारणाचं दिवाळं निघालंय, समाजकारणाचं वाटोळ झालंय आणि संस्कृतिचा बट्ट्याबोळ झालेल्या काळामध्ये भारताच्या लोकशाहीला आधार वाटावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. आज भारताची लोकशाही फक्त न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे की काय, असा प्रश्नही उपस्थित करत त्यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर टिप्पणी केली. 

ज्येष्ठ कामगार साहित्यिक दादाभाऊ गावडे लिखीत ‘ध्येयवेड्यांची यशोगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी पिंपरी येथे झाले. त्यावेळी श्रीपाल सबनीस बोलत होते. सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत अधिकारी चंद्रकांत दळवी यावेळी उपस्थित होते. 

श्रीपाल सबनीस म्हणाले, राजकीय पदाधिकाऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचे उमाळे नाटकी असतात. दु:खाला, वेदनेला आणि गरिबिला जात किंवा धर्म नसतो. अशा परिस्थितीत पुढच्या चार पिढ्या बसून खातील इतका पैसा कमावला जातो. पण आपल्या पुढच्या पिढीला आयता पैसा मिळाला तर सावधान, आपल्या बापजाद्यांनी पैसा कसा कमावला याची जाणीव प्रत्येक पिढीला झाली पाहिजे. त्यासाठी ध्येयवेड्या माणसांचे चारित्र्य वाचन केले पाहिजे. अशा चारित्र्यासाठी इमानदारी, प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. त्यासाठी आई-वडिलांचे संस्कार महत्त्वाचे आहेत. ज्यांचे गणित बरोबर आहे, त्यांच्या आयुष्याचंही गणित जुळून येते.  

चंद्रकांत दळवी म्हणाले, आयुष्याच्या वाटचालील अडथळा निर्माण झाला की माणसे मागे फिरतात. मात्र या परिस्थितीला जे सामोरे जातात ते यशस्वी होतात. गरिबीच्या पलिकडे एक जग आहे. हलाखीचं एक जग आहे. अशा परिस्थितीत ध्येयवेडी माणसं लढा देत पुढे येतात. संधी अनेकांकडे येते. मात्र, ९५ टक्के लोकांना संधी ओळखताच येत नाही. ज्यांना कळते ते संधीचे सोने करतात. शहरांचा विकास होतोय. पिंपरी-चिंचवड शहर हे त्याचे आद्य माॅडेल आहे. मात्र, खेड्यांचा विकास कसा होणार हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी शहरातील लोकांनी गावाकडे जाऊन काम केले पाहिजे, तरच गावांचा चेहरामोहरा बदलेल.    

प्रशासकीय अधिकारी करंटे, कलंकित

प्रशासकीय अधिकारी हे करंटे, कलंकित असतात, कुठे ना कुठे काही तरी खोट असते. खेड्यांचा विकास आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी चांगले लाभले पाहिजेत. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शुद्धतेचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले पाहिजे, असे मत श्रीपाल सबनिस यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणSocialसामाजिकcultureसांस्कृतिक