शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लोकशाही केवळ न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे का? श्रीपाल सबनीस यांचा सवाल

By नारायण बडगुजर | Updated: April 9, 2023 16:37 IST

भारताच्या लोकशाहीला आधार वाटावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात आहे

पिंपरी : राजकारणाचं दिवाळं निघालंय, समाजकारणाचं वाटोळ झालंय आणि संस्कृतिचा बट्ट्याबोळ झालेल्या काळामध्ये भारताच्या लोकशाहीला आधार वाटावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. आज भारताची लोकशाही फक्त न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे की काय, असा प्रश्नही उपस्थित करत त्यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर टिप्पणी केली. 

ज्येष्ठ कामगार साहित्यिक दादाभाऊ गावडे लिखीत ‘ध्येयवेड्यांची यशोगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी पिंपरी येथे झाले. त्यावेळी श्रीपाल सबनीस बोलत होते. सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत अधिकारी चंद्रकांत दळवी यावेळी उपस्थित होते. 

श्रीपाल सबनीस म्हणाले, राजकीय पदाधिकाऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचे उमाळे नाटकी असतात. दु:खाला, वेदनेला आणि गरिबिला जात किंवा धर्म नसतो. अशा परिस्थितीत पुढच्या चार पिढ्या बसून खातील इतका पैसा कमावला जातो. पण आपल्या पुढच्या पिढीला आयता पैसा मिळाला तर सावधान, आपल्या बापजाद्यांनी पैसा कसा कमावला याची जाणीव प्रत्येक पिढीला झाली पाहिजे. त्यासाठी ध्येयवेड्या माणसांचे चारित्र्य वाचन केले पाहिजे. अशा चारित्र्यासाठी इमानदारी, प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. त्यासाठी आई-वडिलांचे संस्कार महत्त्वाचे आहेत. ज्यांचे गणित बरोबर आहे, त्यांच्या आयुष्याचंही गणित जुळून येते.  

चंद्रकांत दळवी म्हणाले, आयुष्याच्या वाटचालील अडथळा निर्माण झाला की माणसे मागे फिरतात. मात्र या परिस्थितीला जे सामोरे जातात ते यशस्वी होतात. गरिबीच्या पलिकडे एक जग आहे. हलाखीचं एक जग आहे. अशा परिस्थितीत ध्येयवेडी माणसं लढा देत पुढे येतात. संधी अनेकांकडे येते. मात्र, ९५ टक्के लोकांना संधी ओळखताच येत नाही. ज्यांना कळते ते संधीचे सोने करतात. शहरांचा विकास होतोय. पिंपरी-चिंचवड शहर हे त्याचे आद्य माॅडेल आहे. मात्र, खेड्यांचा विकास कसा होणार हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी शहरातील लोकांनी गावाकडे जाऊन काम केले पाहिजे, तरच गावांचा चेहरामोहरा बदलेल.    

प्रशासकीय अधिकारी करंटे, कलंकित

प्रशासकीय अधिकारी हे करंटे, कलंकित असतात, कुठे ना कुठे काही तरी खोट असते. खेड्यांचा विकास आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी चांगले लाभले पाहिजेत. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शुद्धतेचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले पाहिजे, असे मत श्रीपाल सबनिस यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणSocialसामाजिकcultureसांस्कृतिक