शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंच नसलेली शाळा ते भारताचे सरन्यायाधीश; सूर्य कांत यांचा प्रेरणादायी प्रवास; राष्ट्रपतींनी दिली 'सर्वोच्च' पदाची शपथ
2
वडिलांनी पोलिसांसमोर जोडले हात, अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार
3
'आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा, घरी लग्न आहे... चार दिवसांनी घेऊन जाऊ', मुलाचं वृद्धाश्रमाला उत्तर; बापाला अश्रू अनावर!
4
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड
5
तेजस फायटर जेट क्रॅशचा मोठा फटका! HAL च्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची मोठी घसरण; अजून पडणार?
6
'आम्ही काव्याकडे जातोय...'; लेकीच्या विरहाने ग्रासलं, संपूर्ण कुटुंबानं एकत्र आयुष्य संपवलं! वाचून काळजाचं पाणी होईल! 
7
२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
8
नांतवाला भेटायला गेला, कॅनडातून भारतीयाला हाकलवून दिले; मुलींचा छळ, जबरदस्तीने 'सेल्फी' घेणं पडलं महागात
9
तुमच्या घराचं स्वप्न साकार होणार! PM आवास योजना २०२५ ची नवीन यादी जाहीर; असे तपासा आपले नाव!
10
दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ? 
11
Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ
12
बाँड्समध्ये जास्त रिटर्न, पण जोखीम किती? FD मध्ये ₹५ लाखांची सुरक्षा; गुंतवणुकीचा योग्य फॉर्म्युला काय?
13
वाहतूककोंडीमुळे घोडबंदर रस्ता दुरुस्ती रखडली; अवजड वाहनांना प्रवेशबंदीचा बार ठरला 'फुसका'
14
'शोले'तील 'गब्बर'चा मुलगा, राणी मुखर्जीचा पहिला हिरो; आता कुठे गायब आहे अभिनेता?
15
IND vs SA : गुवाहाटीत द. आफ्रिकेचं “समदं ओकेमध्ये हाय…”; भारताचे 'शेर' पहिल्या डावात सपशेल ढेर!
16
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
17
लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या 'या' खास पोस्ट
18
एक ट्रीप, २ देश...कमी खर्चात कसं करायचा 'डबल प्रवास'?; जाणून घ्या बजेटमधला परफेक्ट फॉर्म्युला
19
"जिथे जोगतीणींची लग्न लागतात तिथेच शूटिंग झालं...", मुक्ता बर्वेने सांगितला 'जोगवा'चा अनुभव, म्हणाली...
20
"अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारुन मी स्वतःची कबर खोदली"; बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय पश्चाताप
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: ''सत्तर हजार कोटी गेले कुठे चौकशी करायला नको''

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 22:48 IST

न बोलवताच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात गेले. बोलावल्यानंतर जावेच लागेल.

पिंपरी : न बोलवताच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात गेले. बोलावल्यानंतर जावेच लागेल. बँक घोटाळा, सिंचनातील सत्तर हजार कोटी कुठे गेले याची चौकशी व्हायला नको, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंपरीतील सभेत केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मैदानावर शिवसेनेची सभा झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा सदस्य अमर साबळे, महापौर राहुल जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, उपनेत्या डॉ. नीलम गो-हे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे,  जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, डॉ. रघुनाथ कुचिक आदी उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात आम्ही ठरवलय युतीचेच सरकार येणार आहे. गोरगरिबांच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी युती केली आहे. लोकसभेला विरोधी पक्ष थोडा तरी शिल्लक होता. आता विधानसभेच्या निवडणुकीतही तोही शिल्लक नाही. काही ठिकाणी उमेदवारही दिले नाहीत. त्याच्याकडून नाराज होऊन नेते बाहेर पडताहेत. उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावरून विरोधीपक्षाची अवस्था लक्षात येईल. युतीसरकार लक्ष्य करीत आहेत, ही पवारांची टीका चुकीची आहे. दहा रुपयात जेवण, एक रूपयात आरोग्य तपासणी, मुलांना शिष्यवृत्ती देण्याची योजना आणणार आहे.’’धरण भरण्याची वाट पाहत होतोविकासकामांवर आणि आश्वासनांवर होणा-या टीकांचा समाचार ठाकरे यांनी घेतला. ठाकरे म्हणाले, ‘‘शेतकरी कर्जमाफी ऐवजी कर्जमुक्ती देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. सत्तेचा आणि यंत्रणेचा गैरवापर केला जातोय, असा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे. बँक घोटाळा, सिंचनातील सत्तर हजार कोटी कोठे गेले याची चौकशी व्हायला नको? दंगल प्रकरण घडून गेल्यानंतर दहा वर्षांनी  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केस उकरून काढली. त्यावेळी सत्तेचा दुरूपयोग नव्हता का? हे राजकारण नव्हते का?’’  दहा रूपयात जेवण या आम्ही दिलेल्या आश्वासनावर अजित पवारांनी टीका केली. पाच वर्षे काय केले? अशी टीका केली. पाच वर्षे दुष्काळ होता, धरण भरायची वाट पाहात होतो, या ठाकरे यांच्या वक्तव्यावर हशा पिकला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019