शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वीज बिल न भरल्याने देहूगावचा पाणी पुरवठा बंद; २८ लाख रुपये महावितरणची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 17:08 IST

ऐन उन्हाळ्यात विद्यूत पुरवठा खंत केल्याने पाणी पुरवठा बंद झाला असल्याने देहूकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे

देहूगाव : इंद्रायणी नदीत मुबलक पाणी असताना देहूगावच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे 28 लाख 55 हजार 99 रुपये वीज बिल थकल्याने महावितरणने नळपाणी पुरवठा योजनेसह, मैला शुध्दीकरण प्रकल्पाचा देखील विद्युत पुरवठा खंडित केल्याने देहूकरांचा गेल्या दोन दिवसांपासुन पाणी पुरवठा बंद आहे.

ऐन उन्हाळ्यात विद्यूत पुरवठा खंत केल्याने पाणी पुरवठा बंद झाला असल्याने देहूकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नियमित पाणी बिल भरणाऱ्या सर्वसामान्य नळजोड धारक ग्राहकांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. देहूगाव ग्रामपंचायतीचे 8 नोव्हेंबर 2020 मध्ये नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले. यावेळी ग्रामपंचायतीकडे नळपाणी पुरवठा विभागाचे सुमारे 34 लाख रुपये थकले होते.

ग्रामपंचायतीचे रुपांतर होताना अनेक देणी थकीत होती. जो निधी अथवा रक्कम शिल्लक होती ती रक्कम विविध देणीदारांची देणी चुकती करण्यात खर्ची झाली होती. तर काही देणी नंतर देण्यात आली. त्यातच कोरोना चा प्रभाव वाढल्याने गावची घरपट्टी व पाणी पट्टी वसुली थकलेली आहे. कोरोनामुळेच शासनाकडून देखील निधी उपलब्धतेबाबत अडचणी येत असल्याने नगरपंचायतीचा खर्च कसा भागवावा हा देखील प्रशासकांच्या पुढे यक्षप्रश्न आहे.

एकंदरीत नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीकडे वीज बिल भरण्यासाठी शिल्लक रक्कम नव्हती. त्यामुळे एक महिन्यापुर्वीच महावितरणकडून याबाबत वीजजोड तोडण्याची कारवाई करण्यात येणार होती. परंतू खासदार श्रीरंग बारणे यांच्या शिष्टाईमुळे ती कारवाई थांबली होती व सहा महिन्यात टप्प्या टप्प्याने नगरपंचायत ही बिले भरेल असे सांगितले होते. नगरपंचायत रक्कम भरणे अपेक्षित होते. परंतू प्रशासनाने कडून ही रक्कम भरली न गेल्याने महावितरणने कारवाई करत बुधवारी सकाळी 11 वाजता बोडकेवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा विद्यूत पुरवठा खंडित केला आहे.

याबाबत महावितरणचे शाखा अभियंता अनिल मुरदडगौंडा यांनी सांगितले, नगरपंचायतकडे अद्यापही 28 लाख 55 हजार 99 रुपये थकीत आहे. या महिन्यात नगरपंचायतीने काही रक्कम भरणे अपेक्षित होते, परंतू त्यांनी ती रक्क्म भरली नसल्याने विद्यूत पुरवठा खंडित केला. 

माजी सरपंच हेमा मोरे म्हणाल्या की, देहूचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र प्रशासक आवश्यक असून येत्या दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर नगरपंचायतीवर मोर्चा नेण्यात येईल अशा इशारा दिला आहे.         

टॅग्स :dehuदेहूmahavitaranमहावितरणcorona virusकोरोना वायरस बातम्याWaterपाणीgram panchayatग्राम पंचायत