शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल न भरल्याने देहूगावचा पाणी पुरवठा बंद; २८ लाख रुपये महावितरणची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 17:08 IST

ऐन उन्हाळ्यात विद्यूत पुरवठा खंत केल्याने पाणी पुरवठा बंद झाला असल्याने देहूकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे

देहूगाव : इंद्रायणी नदीत मुबलक पाणी असताना देहूगावच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे 28 लाख 55 हजार 99 रुपये वीज बिल थकल्याने महावितरणने नळपाणी पुरवठा योजनेसह, मैला शुध्दीकरण प्रकल्पाचा देखील विद्युत पुरवठा खंडित केल्याने देहूकरांचा गेल्या दोन दिवसांपासुन पाणी पुरवठा बंद आहे.

ऐन उन्हाळ्यात विद्यूत पुरवठा खंत केल्याने पाणी पुरवठा बंद झाला असल्याने देहूकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नियमित पाणी बिल भरणाऱ्या सर्वसामान्य नळजोड धारक ग्राहकांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. देहूगाव ग्रामपंचायतीचे 8 नोव्हेंबर 2020 मध्ये नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले. यावेळी ग्रामपंचायतीकडे नळपाणी पुरवठा विभागाचे सुमारे 34 लाख रुपये थकले होते.

ग्रामपंचायतीचे रुपांतर होताना अनेक देणी थकीत होती. जो निधी अथवा रक्कम शिल्लक होती ती रक्कम विविध देणीदारांची देणी चुकती करण्यात खर्ची झाली होती. तर काही देणी नंतर देण्यात आली. त्यातच कोरोना चा प्रभाव वाढल्याने गावची घरपट्टी व पाणी पट्टी वसुली थकलेली आहे. कोरोनामुळेच शासनाकडून देखील निधी उपलब्धतेबाबत अडचणी येत असल्याने नगरपंचायतीचा खर्च कसा भागवावा हा देखील प्रशासकांच्या पुढे यक्षप्रश्न आहे.

एकंदरीत नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीकडे वीज बिल भरण्यासाठी शिल्लक रक्कम नव्हती. त्यामुळे एक महिन्यापुर्वीच महावितरणकडून याबाबत वीजजोड तोडण्याची कारवाई करण्यात येणार होती. परंतू खासदार श्रीरंग बारणे यांच्या शिष्टाईमुळे ती कारवाई थांबली होती व सहा महिन्यात टप्प्या टप्प्याने नगरपंचायत ही बिले भरेल असे सांगितले होते. नगरपंचायत रक्कम भरणे अपेक्षित होते. परंतू प्रशासनाने कडून ही रक्कम भरली न गेल्याने महावितरणने कारवाई करत बुधवारी सकाळी 11 वाजता बोडकेवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा विद्यूत पुरवठा खंडित केला आहे.

याबाबत महावितरणचे शाखा अभियंता अनिल मुरदडगौंडा यांनी सांगितले, नगरपंचायतकडे अद्यापही 28 लाख 55 हजार 99 रुपये थकीत आहे. या महिन्यात नगरपंचायतीने काही रक्कम भरणे अपेक्षित होते, परंतू त्यांनी ती रक्क्म भरली नसल्याने विद्यूत पुरवठा खंडित केला. 

माजी सरपंच हेमा मोरे म्हणाल्या की, देहूचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र प्रशासक आवश्यक असून येत्या दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर नगरपंचायतीवर मोर्चा नेण्यात येईल अशा इशारा दिला आहे.         

टॅग्स :dehuदेहूmahavitaranमहावितरणcorona virusकोरोना वायरस बातम्याWaterपाणीgram panchayatग्राम पंचायत