शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भाकरीचा चंद्र शोधण्यात जातो दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:31 IST

पावसामुळे कामे मंदावल्याने रोजगार घटला; कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मजुरांपुढे प्रश्न

रहाटणी : मागील काही दिवसांपासून पावसाने शहरासह परिसरात दमदार हजेरी लावली असल्याने त्याचा परिनाम सर्वच स्तरांतील व्यवसायावर झाला आहे. सततच्या पावसामुळे अनेक कामे मंद गतीने सुरू आहेत. याचा जास्त परिणाम बांधकाम व्यवसायावर झाल्याचे दिसून येत आहे. कारण सध्या मजूर अड्ड्यावर कामाच्या प्रतीक्षेत अनेक मजूर दिवसभर कामाच्या प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. कामाची गती मंदावल्याने कामगारांपुढे अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने कामाच्या शोधात दिवस मजूर अड्ड्यावर काढण्याची वेळ अनेकांवर आली आहे.सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. त्याचा फटका बांधकाम व्यवसायालाही बसला आहे. सध्या सुरू असलेले छोटे-मोठे बांधकाम थांबविले असल्याने मजुरांना काम मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. गावाकडे काम नसल्याने अनेकांनी इथे तरी काम मिळेल असे म्हणत शहराचा रस्ता धरला आहे. मात्र या ठिकाणीदेखील पावसामुळे बरेचसे काम बंद ठेवण्यात आले असल्याने कामगारांना काम नाही. अनेक कामगार मजूर अड्ड्यावर दिवसभर बसून आहेत. रहाटणी फाटा येथील मजूर अड्ड्यावर सकाळी हजारो कामगार कामाच्या प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. यात बिगारी, बांधकाम मिस्त्री, सुतार, प्लंबर, इमारत रंगकाम करणारे, फरशी मिस्त्री यांसह अनेक विविध प्रकारचे काम करणारे कामगार कामाविना कामगार अड्ड्यावर सध्या बसून आहेत. हा पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला, तर या कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.बरेच कामगार येथे भाड्याच्या घरात राहत आहेत. त्याचे अवाच्या सव्वा भाडे, वीजबिल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, महिन्याचा घरातील खर्च याचा ताळमेळ बसवणे कठीण असल्याची भावना काही कामगारांनी बोलून दाखविली आहे. गावाकडे पेरणीचे दिवस असले, तरी अनेकांनी गाव गाठला नाही. कारण यापेक्षाही गावाची परिस्थिती भयानक असल्याने मिळेल ते काम करून गुजराण करण्याच्या हेतूने येथेच राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुरू होती, तीही कामे बंद झाल्याने ‘येथे राहता येत नाही व गावी जाता येत नाही’ अशी काहीशी अनेकांची परिस्थिती झाली आहे.काम मिळेल का काम?सध्या पावसाचे दिवस असल्याने अनेक मजुरांना काम मिळत नसल्याचे भयावह चित्र मजूर अड्ड्यावर दिसून येत आहे. अड्ड्यावर काम मिळत नसल्याने अनेक कामगार शहरातील मोठ-मोठ्या बांधकाम साइटवर जाऊन काम मिळेल काय अशी विचारणा करू लागले आहेत. मात्र, आमच्याकडेच कामगार जास्त झाल्याचे सांगत ठेकेदार वेळ मारून नेत आहेत. त्यामुळे कामगारांवर सध्या भटकंतीची पाळी आली आहे. काम मिळत नसल्याने सध्या मिस्त्रीदेखील मिळेल ते काम करण्याची तयारी दाखवीत आहेत. एखादा व्यक्ती मजूर पाहिजे म्हणून कामगार अड्ड्यावर गेला, की त्याच्या भोवती पाच-पन्नास कामगार गोळा होत आहेत. मी येतो, मी येतो अशी ओरड करीत आहेत. एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील कामगार आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे चित्र सध्या आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड