शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाकरीचा चंद्र शोधण्यात जातो दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:31 IST

पावसामुळे कामे मंदावल्याने रोजगार घटला; कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मजुरांपुढे प्रश्न

रहाटणी : मागील काही दिवसांपासून पावसाने शहरासह परिसरात दमदार हजेरी लावली असल्याने त्याचा परिनाम सर्वच स्तरांतील व्यवसायावर झाला आहे. सततच्या पावसामुळे अनेक कामे मंद गतीने सुरू आहेत. याचा जास्त परिणाम बांधकाम व्यवसायावर झाल्याचे दिसून येत आहे. कारण सध्या मजूर अड्ड्यावर कामाच्या प्रतीक्षेत अनेक मजूर दिवसभर कामाच्या प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. कामाची गती मंदावल्याने कामगारांपुढे अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने कामाच्या शोधात दिवस मजूर अड्ड्यावर काढण्याची वेळ अनेकांवर आली आहे.सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. त्याचा फटका बांधकाम व्यवसायालाही बसला आहे. सध्या सुरू असलेले छोटे-मोठे बांधकाम थांबविले असल्याने मजुरांना काम मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. गावाकडे काम नसल्याने अनेकांनी इथे तरी काम मिळेल असे म्हणत शहराचा रस्ता धरला आहे. मात्र या ठिकाणीदेखील पावसामुळे बरेचसे काम बंद ठेवण्यात आले असल्याने कामगारांना काम नाही. अनेक कामगार मजूर अड्ड्यावर दिवसभर बसून आहेत. रहाटणी फाटा येथील मजूर अड्ड्यावर सकाळी हजारो कामगार कामाच्या प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. यात बिगारी, बांधकाम मिस्त्री, सुतार, प्लंबर, इमारत रंगकाम करणारे, फरशी मिस्त्री यांसह अनेक विविध प्रकारचे काम करणारे कामगार कामाविना कामगार अड्ड्यावर सध्या बसून आहेत. हा पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला, तर या कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.बरेच कामगार येथे भाड्याच्या घरात राहत आहेत. त्याचे अवाच्या सव्वा भाडे, वीजबिल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, महिन्याचा घरातील खर्च याचा ताळमेळ बसवणे कठीण असल्याची भावना काही कामगारांनी बोलून दाखविली आहे. गावाकडे पेरणीचे दिवस असले, तरी अनेकांनी गाव गाठला नाही. कारण यापेक्षाही गावाची परिस्थिती भयानक असल्याने मिळेल ते काम करून गुजराण करण्याच्या हेतूने येथेच राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुरू होती, तीही कामे बंद झाल्याने ‘येथे राहता येत नाही व गावी जाता येत नाही’ अशी काहीशी अनेकांची परिस्थिती झाली आहे.काम मिळेल का काम?सध्या पावसाचे दिवस असल्याने अनेक मजुरांना काम मिळत नसल्याचे भयावह चित्र मजूर अड्ड्यावर दिसून येत आहे. अड्ड्यावर काम मिळत नसल्याने अनेक कामगार शहरातील मोठ-मोठ्या बांधकाम साइटवर जाऊन काम मिळेल काय अशी विचारणा करू लागले आहेत. मात्र, आमच्याकडेच कामगार जास्त झाल्याचे सांगत ठेकेदार वेळ मारून नेत आहेत. त्यामुळे कामगारांवर सध्या भटकंतीची पाळी आली आहे. काम मिळत नसल्याने सध्या मिस्त्रीदेखील मिळेल ते काम करण्याची तयारी दाखवीत आहेत. एखादा व्यक्ती मजूर पाहिजे म्हणून कामगार अड्ड्यावर गेला, की त्याच्या भोवती पाच-पन्नास कामगार गोळा होत आहेत. मी येतो, मी येतो अशी ओरड करीत आहेत. एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील कामगार आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे चित्र सध्या आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड