शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

विद्यार्थ्यांचा होडीतून धोकादायक प्रवास , पहिल्या दिवसापासूनच शाळेसाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:25 IST

नाणोली व वराळे गावातील शेतकरी व महिलांबरोबर शाळेसाठी विद्यार्थ्यांना होडीतून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा मागणी करूनही या नदीवर पूल उभारला जात नसल्याने तीन पिढ्यांपासून विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेसाठी कसरत करावी लागते.

- विजय सुराणावडगाव मावळ : नाणोली व वराळे गावातील शेतकरी व महिलांबरोबर शाळेसाठी विद्यार्थ्यांना होडीतून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा मागणी करूनही या नदीवर पूल उभारला जात नसल्याने तीन पिढ्यांपासून विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेसाठी कसरत करावी लागते. पावसाळ््यात इंद्रायणी नदीला पूर असल्यानंतर होडीतील प्रवासात धोक्याची शक्यता अधिक बळावते. शाळेच्या पहिल्या दिवसांपासून ही कसरत सुरू झाली आहे.मावळ तालुक्यातील अतिदुर्गम भागात नागरिकांना प्रवासासाठी रस्ते व पुलाची सुविधा नाही. त्यामुळे नाणोली गावच्या ग्रामस्थांना होडीशिवाय इंद्रायणीच्या अलीकडे-पलीकडे जाण्याचा दुसरा मार्गच नाही. नाणोली गावची लोकसंख्या सुमारे तेराशे आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मार्ग म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. नाणोली, वराळे व इतर गावांतील मुले-मुलींना शाळेत जाण्यासाठी होडीचा वापर अपिरहार्य आहे.नव्या होडीची आशावराळे-नाणोली इंद्रायणी नदीवर पूल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. सध्याची होडी निकामी झाली असून, नवीन होडी द्यावी, तसेच पुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी माजी सभापती धोंडिबा मराठे, माऊली मराठे, विशाल लोंढे, अरुण लोंढे, संतोष लोंढे, मल्हारी कोंडे यांनी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी, जिल्हा परिषदेकडून नवीन नाव लवकर आणण्याचे आश्वासन दिले.तीन पिढ्यांचा व्यवसायसुरुवातील दत्तोबा गव्हाणे यांनी होडीतून प्रवासाचा व्यावसाय सुरू केला. त्यानंतर मुलगा बळीराम आणि सून बिबाबाई याही हाच व्यवसाय करीत आहेत. या मोबदल्यात पैसे न घेता धान्य घेतले जायचे. ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थ्यांची सेवा आमच्या हातून घडते हे आमचे भाग्य आहे.परंतु महागाईचे दिवस आहेत. नुसत्या धान्यावर घर चालत नाही. शासन वा दोन्ही ग्रामपंचायतींनी मानधन दिले पाहिजे, असे बिबाबाई गव्हाणे यांनी सांगितले.पर्यायी व्यवस्थेची आवश्यकताइंद्रायणीच्या पलिकडे जाण्यासाठी असलेल्या होडीची अवस्था बिकट असून, तळाला छिद्रे पडली आहेत. त्यामुळे होडीत काही प्रमाणात पाणी घुसते. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना झाडाच्या खोडाला तारा व दोरखंड बांधले आहेत. त्या आधारे होडी ओढून पुढे नेली जाते. आता पावसाळा सुरू झाला आहे. अचानक पाऊस वाढल्यास नदीला पूर येतो, त्यावेळी आपत्कालीन व आणीबाणीच्या परिस्थिती प्रवाशांना वाचविण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था याठिकाणी नाही. नाणोली व वराळे ग्रामस्थांसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाeducationशैक्षणिक