शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Corona virus : सगळी जबाबदारी प्रशासनाचीच, आपण स्वयंशिस्त पाळणार नाही का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 20:12 IST

नियमांचे उल्लंघन केल्याने संसर्गाचा धोका अधिक

ठळक मुद्दे प्रशासनाकडून अपेक्षा चूक की बरोबर 

पिंपरी : औद्योगिक नगरीतील कोरोनाच्या आकडेवारीने नागरिकांसह प्रशासनाच्या उरात धडकी भरली आहे. सतत वाढणा-या रुग्णांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. रुग्णालयांमध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. बेड कमी पडत आहेत. अनेक ठिकाणी अपुऱ्या सोयी आहेत. अशी परिस्थिती असताना सगळा भार प्रशासनावर टाकून प्रश्न सुटणार आहे का? याचा विचार नागरिकांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. नियमांचे उल्लंघन करुन फिरत आहे. अशावेळी प्रशासनाकडून किती आणि कोणती अपेक्षा करणार ? हा प्रश्न सध्याच्या परिस्थितीतून समोर आला आहे.       पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा बाधितांची रोजची संख्या शंभराहून अधिक आहे. रोज सरासरी 5 पेक्षा जास्त मृत्यु आहेत. वारंवार पालिका आणि जिल्हा प्रशासन नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करुन देखील नागरिक त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. मागील आठवड्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगितले. मात्र यात नागरिकांनी स्वत: शिस्त पाळुन सहकार्य दाखविणे गरजेचे आहे.   

जुलै महिन्यातील लॉकडाऊन दरम्यान दोन हजारांपेक्षा वाहनचालकांवर करण्यात आलेली कारवाई, तर तीन हजार जणांवर खटले दाखल करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगाल्यानंतर नागरिक पोलिसांवरच आगपाखड करतात. परंतु लॉकडाऊनमध्ये नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी नाही. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना असूनही ते बिनदिक्कतपणे मॉर्निंग वॉक च्या नावाखाली घराबाहेर पडत आहेत. चहाच्या टप-यांबाहेर तरुणाची गर्दी आहे. छोट्या मोठ्या खाद्यपदार्थांच्या दुकानबाहेर नागरिक इभे आहेत. 

  नागरिकांचे चुकते काय ? - कुठलेही कारण सांगून घराबाहेर पडणे - खरेदीच्या नावाने गप्पा मारण्यात वेळ घालवणे - ज्येष्ठांनी आरोग्याच्या नावाखाली संसगार्चा धोका वाढवणे - अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीच्या नावाखाली दुकानाबाहेर गर्दी करणे - भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झालेली झुंबड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसshravan hardikarश्रावण हर्डिकर