शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत कोरोना काळातील दीड वर्षात ६३ आत्महत्या; अनेकांनी नैराश्यातून संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 11:06 IST

प्रत्येकाला कोरोना महामारीचा फटका: मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना भावनिक व आर्थिक आधार देण्याची गरज

ठळक मुद्देअडीच वर्षात शहरातील ११८ जणांनी संपविली जीवनयात्रा

नारायण बडगुजर

पिंपरी:कोरोनामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. तरुण, व्यावसायिक हातावर पॉट असलेले नागरिक सर्वानाच या महामारीचा फाटक बसला. त्यांच्यासमोर कुटुंब कसे जगवायचे हा प्रश्नही उपस्थित झाला होता. अशा चिंताजनक परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या दीड वर्षांत ६२ आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर मागील अडीच वर्षात ११८ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना भावनिक व आर्थिक आधार देण्याची गरज आहे. असा सल्ला मानसोपचारतज्ञांनी दिला आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत औद्योगिक क्षेत्रातील कामगार, आयटीयन्स यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. त्याच तुलनेत व्यावसायिक व हातावर पोट असलेले सामान्य कुटुंब देखील आहेत. यातील प्रत्येकाला कोरोना महामारीचा फटका बसला. बेरोजगारी वाढल्याने गुन्हेगारी क्षेत्राकडे देखील अनेकांची पावले वळली आहेत. मात्र अनेक जण मनाने खचले. त्यातून सावरणे त्यांना शक्य झाले नाही. परिणामी टोकाची भूमिका घेत त्यांनी आत्महत्या केली. यातून त्यांच्या आयुष्यासह त्यांचे कुटुंब देखील उद्धवस्त झाले. अनेकांची मुले उघड्यावर आली. तसेच काही जणांचा म्हातारपणाचा आधार गेला. नवविवाहित असलेल्या काही जणांनी आत्महत्या केली. यात त्यांच्या जोडीदाराला मोठा मानसिक धक्का बसला.

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा रोजगार गेल्यास त्याला मानसिक आधार दिला पाहिजे. तसेच त्याला पुन्हा काम मिळण्यासाठी प्रयत्न करून किंवा इतर उद्योग व्यवसायाठी आर्थिक तसेच प्रत्यक्ष हातभार लावावा. घरातील तरुण, विद्यार्थी किंवा कोणतीही व्यक्ती मनाने एकटी पडणार नाही किंवा त्यांचा एकलकोंडेपणा वाढणार नाही, यासाठी त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. प्रसंगी आवश्यकतेनुसार मानसोपचार तज्ज्ञ, डाॅक्टर यांच्याकडे नेऊन समुपदेशन व योग्य उपचार करावेत.

"प्रत्येकाने आपले दु:ख तसेच इतर भावना जवळच्या किंवा विश्वासू व्यक्तील सांगितल्या पाहिजेत. त्यासाठी बोलते राहून वेळोवेळी मन मोकळे करावे. घरातील प्रत्येकाने एकमेकांबाबत निरीक्षण करून वागण्यातील बदल, चांगले व खटकणारे बदल काय, हे निदर्शनास आणून द्यावेत. त्यामुळे चुका सुधारण्यास मदत होईल. तसेच चांगले काम करण्याचा उत्साह वाढेल.'' असे  वायसीएम रुग्णालयातील मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. मनजित संत्रे यांनी सांगितले आहे. 

शहरातील आत्महत्या

२०१९ - ५५२०२० - ३७२०२१ (मे पर्यंत) - २६

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूdocterडॉक्टरStudentविद्यार्थीlife after coronavirusकोरोनानंतरचं जगणं