शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पिंपरीत कोरोना काळातील दीड वर्षात ६३ आत्महत्या; अनेकांनी नैराश्यातून संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 11:06 IST

प्रत्येकाला कोरोना महामारीचा फटका: मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना भावनिक व आर्थिक आधार देण्याची गरज

ठळक मुद्देअडीच वर्षात शहरातील ११८ जणांनी संपविली जीवनयात्रा

नारायण बडगुजर

पिंपरी:कोरोनामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. तरुण, व्यावसायिक हातावर पॉट असलेले नागरिक सर्वानाच या महामारीचा फाटक बसला. त्यांच्यासमोर कुटुंब कसे जगवायचे हा प्रश्नही उपस्थित झाला होता. अशा चिंताजनक परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या दीड वर्षांत ६२ आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर मागील अडीच वर्षात ११८ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना भावनिक व आर्थिक आधार देण्याची गरज आहे. असा सल्ला मानसोपचारतज्ञांनी दिला आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत औद्योगिक क्षेत्रातील कामगार, आयटीयन्स यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. त्याच तुलनेत व्यावसायिक व हातावर पोट असलेले सामान्य कुटुंब देखील आहेत. यातील प्रत्येकाला कोरोना महामारीचा फटका बसला. बेरोजगारी वाढल्याने गुन्हेगारी क्षेत्राकडे देखील अनेकांची पावले वळली आहेत. मात्र अनेक जण मनाने खचले. त्यातून सावरणे त्यांना शक्य झाले नाही. परिणामी टोकाची भूमिका घेत त्यांनी आत्महत्या केली. यातून त्यांच्या आयुष्यासह त्यांचे कुटुंब देखील उद्धवस्त झाले. अनेकांची मुले उघड्यावर आली. तसेच काही जणांचा म्हातारपणाचा आधार गेला. नवविवाहित असलेल्या काही जणांनी आत्महत्या केली. यात त्यांच्या जोडीदाराला मोठा मानसिक धक्का बसला.

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा रोजगार गेल्यास त्याला मानसिक आधार दिला पाहिजे. तसेच त्याला पुन्हा काम मिळण्यासाठी प्रयत्न करून किंवा इतर उद्योग व्यवसायाठी आर्थिक तसेच प्रत्यक्ष हातभार लावावा. घरातील तरुण, विद्यार्थी किंवा कोणतीही व्यक्ती मनाने एकटी पडणार नाही किंवा त्यांचा एकलकोंडेपणा वाढणार नाही, यासाठी त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. प्रसंगी आवश्यकतेनुसार मानसोपचार तज्ज्ञ, डाॅक्टर यांच्याकडे नेऊन समुपदेशन व योग्य उपचार करावेत.

"प्रत्येकाने आपले दु:ख तसेच इतर भावना जवळच्या किंवा विश्वासू व्यक्तील सांगितल्या पाहिजेत. त्यासाठी बोलते राहून वेळोवेळी मन मोकळे करावे. घरातील प्रत्येकाने एकमेकांबाबत निरीक्षण करून वागण्यातील बदल, चांगले व खटकणारे बदल काय, हे निदर्शनास आणून द्यावेत. त्यामुळे चुका सुधारण्यास मदत होईल. तसेच चांगले काम करण्याचा उत्साह वाढेल.'' असे  वायसीएम रुग्णालयातील मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. मनजित संत्रे यांनी सांगितले आहे. 

शहरातील आत्महत्या

२०१९ - ५५२०२० - ३७२०२१ (मे पर्यंत) - २६

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूdocterडॉक्टरStudentविद्यार्थीlife after coronavirusकोरोनानंतरचं जगणं