शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

दूषित पाणीपुरवठाप्रश्नी अधिकाऱ्यांना घेराव : दिघीतील कृष्णानगरमधील समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 19:10 IST

दिघी परिसरातील कृष्णानगरमध्ये मागील एक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठा प्रश्नी गाºहाणे मांडण्यासाठी संतप्त नागरिक महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य प्रशासकीय भवनात दाखल झाले.

ठळक मुद्देसारथीवरील तक्रार बंद केल्याने नागरिकांकडून संताप नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या सारथी योजनेवर तक्रार दाखल लहान मुलांना पोटदुखी, डायरीला, थंडीतापाची लागण होऊन वृद्धांनासुद्धा शारीरिक व्याधी त्रासदायक

दिघी : दूषित पाणीपुरवठा होत असल्याने तक्रार करूनही दखल न घेण्यात आल्याने दिघीच्या कृष्णानगर येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. अखेरीस महापालिका आयुक्तांनाच याबाबत विचारणा करण्यासाठी काही नागरिक महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य प्रशासकीय इमारतीत दाखल झाले. मात्र आयुक्त नसल्याने नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याप्रश्नी घेराव घातला. दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन उपाययोजना का करण्यात आली नाही, असा जाबही संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी या वेळी विचारला.दिघी परिसरातील कृष्णानगरमध्ये मागील एक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी भोसरीतील ई प्रभाग विभागीय पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. तसेच नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या सारथी योजनेवर तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे नियमानुसार सारथीवर आलेल्या नागरी समस्या एक महिन्याच्या आत सोडवून तक्रारदारांचा अभिप्राय घेतला जातो. नंतरच ती तक्रार बंद केली जाते. असा स्पष्ट नियम महापालिकेने केला असला तरी दिघीतील कृष्णानगर भागातील रहिवाशांनी महिन्यापूर्वी दाखल केलेली दूषित पाणी समस्येची तक्रार सोडवली तर नाहीच शिवाय दाखल केलेली तक्रार कुठलाही अभिप्राय न घेता बंद करण्यात आली. ही माहिती जेव्हा नागरिकांना समजली तेव्हा नागरिकांनी थेट आयुक्तांना जाब विचारण्याची आक्रमक भूमिका घेतली. दूषित पाणीपुरवठा प्रश्नी गाºहाणे मांडण्यासाठी संतप्त नागरिक महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य प्रशासकीय भवनात दाखल झाले. मात्र त्या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांच्या कक्षात नव्हते. कामानिमित्त आयुक्त बाहेर गेले होते. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता आयुब पठाण, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, उप कार्यकारी अभियंता दवंडे या संबंधित अधिकाºयांना घेराव घातला. दूषित पाणीपुरवठा होत असून, त्याबाबत तक्रार करून महापालिकेने उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून संतप्त नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी जाब विचारला. परिसरातील पाणी समस्येचा मुद्दा अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. महापालिकेच्या वतीने परिसरात कलेल्या चोवीस तास पाणी योजनेचे काम झाल्यापासून तक्रारी वाढल्याचे नागरिक सांगतात. कृष्णानगर भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन अनेक साथीचे रोग पसरत आहेत. लहान मुलांना पोटदुखी, डायरीला, थंडीतापाची लागण होऊन वृद्धांनासुद्धा शारीरिक व्याधी त्रासदायक ठरत आहेत. कित्येक दिवसांपासून परिसरातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांनी योग्य प्रकारे लक्ष घालावे यासाठी अनेकदा नागरिकांनी समस्यांची गाºहाणी मांडत समस्या सोडविण्याची विनंती केली. मात्र ही गंभीर समस्या एक महिन्यानंतरही कायम आहे तशीच असल्यामुळे नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ प्रशासनाने आणली असल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. महापालिकेचा पाण्याचा टँकर अनेकदा फोन केल्यास कधीतरी येत आहे. अनेक नागरिक स्वत:च्या खचार्ने खासगी टँकर मागवत आपली तहान भागवित आहेत. दूषित पाणी मिळत असल्याची तक्रार कृष्णानगरमधील नागरिकांनी एक महिन्यापूर्वी केली होती. महिना संपल्यामुळे समस्या न सोडवताच सदर तक्रार बंद केल्याने रवी चव्हाण, सिकंदर मनियार, आनंद पाटील, चंद्रकांत देशमुख, शरद पाटील, डॉ. मधुकर गावंडे, काशिनाथ जाधव, अनिल गायकवाड, गुलाब हुसेन शिलेदार, केशव वाघमारे, मंगेश कारले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूषित पाणीपुरवठा प्रश्नी निवेदन दिले..............................दिघीमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती.  यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांच्याकडून माहिती घेतली आहे. तेथील दूषित पाणीपुरवठा होत असलेली दहा ते पंधरा जोड बंद करण्यात आले आहेत. परत त्या परिसरात खोदकाम करून समस्या लवकर सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीचे काम सुरू केले आहे. तक्रार बंद का करण्यात आली याचे कारण कार्यकारी अभियंता यांना मागितले आहे.   - आयुब पठाण, मुख्य कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

टॅग्स :dighiदिघीWaterपाणीHealthआरोग्य