शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

Chinchwad By Election | लोकशाहीवर दरोडा पडला अन् शिवसेना पक्ष चोरीला गेला- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 21:05 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची टीका....

पिंपरी : शेठ काय म्हणतील, तेवढंच ऐकायची तयारी ठेवावी लागेल. संविधानातील तरतुदीही बदलण्याची तयारी सुरू आहे. भारतीय लोकशाहीवर दरोडा पडला अन् शिवसेना पक्ष चोरीला गेला, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पिंपळे सौदागर येथे जयंत पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, डॉ.किरण लहामटे, माजी आमदार विलास लांडे, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेबूब शेख, संजोग वाघेरे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, निवडणूक आयोगाला हाताला धरून शिवसेनेची हत्या केली. यानंतर, स्थानिक पक्ष संपविले जातील. आम्ही १० वर्षे विरोधात राहिलो, तरी आम्हाला प्रॉब्लेम नाही. पुढील दहा वर्षांत लोकशाही टिकणार नाही. देशात सुधारणा काय केल्या, यावर चर्चा नाही. केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीवर कोणी बोलत नाही. विकृती असणाऱ्या लोकांच्या हातात सध्या भाजप पक्ष गेला आहे. लोकसभेतील प्रश्नावर मोदींकडे उत्तरे नाहीत. एलआयसीमध्ये सामान्य नागरिकांनी आयुष्याची पुंजी गुंतवली ती धोक्यात आली आहे. न्यायव्यवस्थाही दबावात काम करत आहेत. न्याय देणारा माणूस माझ्या मताचा असला पाहिजे. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मर्यादित झालं आहे. युट्युब चॅनेलवरही बंदी येत आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

आमदार डॉ.किरण लहामटे म्हणाले, सामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. पिंपरी-चिंचवडचा विकास ही पोहोचपावती आहे. भाजपने आश्वासनाशिवाय काहीही दिलेले नाही. महाविकास आघाडीच ठोस काम करेल.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे