शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भिडे गुरुजींनी धारकरी होण्याऐवजी टाळकरी व्हावे म्हणजे तुकोबा समजेल : संभाजीमहाराज देहूकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:18 IST

पुण्यात संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा मनु पुढे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर वारकरी संप्रदायातून टीका होत असून संत तुकाराम महाराज यांचे वंशज संभाजी महाराज देहूकर यांनी भिडे यांच्यावर टीका केली आहे.

ठळक मुद्देमनुवादी दांभिक विचार वारकरी संप्रदायाला मान्य नाही. भिडे गुरुजींनी वारकऱ्यांची क्षमा मागून प्रायश्चित्त करावे

पिंपरी : संभाजी भिडे यांनी धारकरी होण्यापेक्षा टाळकरी व्हावे, म्हणजे त्यांना तुकोबाराय कळतील. कोण पुढे कोण मागे असला दांभिक मनुवादी विचार वारकरी संप्रदायाला मान्य नाही. गाढव शृंगारिले कोडे, काही केल्या नव्हे घोडे, त्याचे भुंकेने न राहे, स्वभावाशी वरील काय, तुका म्हणे स्वभाव कर्म, काही केल्या न सुटे धर्म...भिडे यांची भीड भाड ठेवण्याएवढे आम्ही नामर्द नाही, अशी टीका देहूतील संत तुकाराम महाराज देवस्थानचे माजी विश्वस्त संभाजीमहाराज देहूकर यांनी केली आहे.पुण्यात संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा मनु पुढे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर वारकरी संप्रदायातून टीका होत असून संत तुकाराम महाराज यांचे वंशज संभाजी महाराज देहूकर यांनी भिडे यांच्यावर टीका केली आहे. देहूकरमहाराज म्हणाले, तुकोबारायांचा रोखठोक भक्तीवाद देखील आम्हाला माहिती आहे. भिडे हे संतद्रोही आणि पाखंडी आहेत. याच जाणिवेतून अशा लोकांचे खंडण आणि मंडण करण्यासाठी तुकोबारायांनी अभंग लिहून ठेवला आहे. धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, तीक्ष्ण़ उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे  असे तुकोबारांयाचे शुद्ध विचार जगणारे आणि जागविणारे आम्ही वारकरी आहोत. भिडे गुरुंजीसारखा सांप्रत मंबाजी-दंभाजी होऊन वारकरी संप्रदायाच्या अस्मितेचा छळ करत आहे. आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन मांडले आहे. त्यापूर्वी ज्ञानोबा तुकोबारायांच्या अभंगाचे दर्शन घेतले असते तर नाठाळ बुद्धी सोज्वळ झाली असती. मनुचे साक्षात्कारी वारसदार म्हणून घेणाऱ्या गुरूजींपी संतांच्या अभंगमय संतांच्या विचारांना वारकरी होऊन स्पर्श केला असता तर अशी नाठाळ आणि बुद्धीभेद करणारी असभ्य वक्तव्ये केली नसती. केवळ एका समाजाच्या भल्यासाठी मनुंनी जातीभेद वर्णभेद, लिंगभेद आणि धर्मभेद केला. कर्मकांडाच्या भिंती उभ्या करून वेदाला आणि देवाला कोंडून ठेवले. त्या सगळ्या कणखर भिंती उखडून टाकण्यासाठी ज्ञानोबारायांनी पसायदान , ज्ञानेश्वरी लिहिली. विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असा आकाशाऐवढा व्यापक भक्तीवाद तुकोबांनी जगापुढे ठेवला. गुरुजींनी वारकºयांची क्षमा मागून प्रायश्चित्त करावे. 

टॅग्स :dehuदेहूsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी