शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा हवी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 1:18 AM

अमृता फडणवीस : महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य हवे

पुणे : समाजात लहान मुला-मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना संतापजनक असून, पुरूषांमधील ही दानवी वृत्ती मारायला पाहिजे. बालकांवर अत्याचार करणाºया आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी लहान मुलांवरील गंभीर घटनांवर बोट ठेवले. खास महिलांसाठी दागिने व कपड्यांच्या ‘कुटॉर’ या प्रदर्शनाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महिला सक्षमीकरणाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, की आज समाजातच नव्हे, तर कुटुंबांमध्येही महिलांवर अत्याचार होत आहेत. आपले मूल्य आपल्यालाच समजायला हवे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आधी महिलांनी महिलांच्या पाठीशी उभे राहणे फार महत्त्वाचे आहे. एकीकडे महिला प्रगतिपथावर जात आहेत तर दुसरीकडे त्या अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. महिलांवरील अत्याचारासंदर्भात एकत्रित आवाज उठविण्याची गरज आहे. महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये दोषींना शिक्षा होण्याचा दर वाढला असून हे सुचिन्ह आहे. मुलगी झाल्यानंतर कन्या भाग्यश्री योजना वगैरे राबविल्या जात आहेत मात्र त्या वरवरच्या आहेत. मुलगी झाल्यानंतर काय, असा प्रश्न पडतो तेव्हा विविध क्षेत्रांतील महिलांचे आदर्श पालकांच्या डोळ्यासमोर ठेवायला हवेत.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग केले जाते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका होते. या ट्रोलिंगकडे कशा पद्धतीने पाहता, या विषयी विचारले असता त्या म्हणाल्या, की लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठीच आपण समाजमाध्यमांवर व्यक्त होत असतो आणि या माध्यमांवर ‘ट्रोलिंग’पासून कोणीही सुटत नाही. हे ट्रोलिंग आपण कसे घेतो ते महत्त्वाचे आहे. विचारांचे खंडन हे योग्य भाषेतच व्हायला हवे. परंतु ट्रोलिंगमधील महिलांसाठी अवमानकारक आणि दहशत पसरवू पाहणाºया पोस्ट मात्र निश्चित निंदनीय असून त्या थांबायला हव्यात. याबाबतीत गरज पडल्यास सायबर कायद्यांची मदत घ्यावी. मुख्यमंत्रीदेखील होणारी टीका सकारात्मक घेऊन त्याची दखल घेत सर्वसमावेशक चचेर्तून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात.

आज ‘फॅशन आयकॉन’ अशी तुमची एक प्रतिमा निर्माण झाली आहे, या विषयी सांगताना त्या म्हणाल्या, मी स्वत:ला ‘फॅशन आयकॉन’ समजत नाही. परंतु ुमाझ्याकडून लोकांना प्रेरणा मिळावी असे मला वाटते. व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी कपडे आणि फॅशन मदत करत असली, तरी आत्मविश्वास ही व्यक्तिमत्त्वातील सर्वांत आवश्यक गोष्ट आहे. माझे अनेक कपडे ‘एनआयएफटी’ संस्थेच्या फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी डिझाईन केलेले आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते याचा आनंद आहे.सध्याचे सरकार खºया अर्थाने ‘सक्षम’गेल्या पाच वर्षांत महिला सबलीकरण, जलयुक्त शिवारसारख्या अनेक चांगल्या योजनांची अंमलबजावणी झाली आहे. जे ५० वर्षांत झाले नाही ते पाच वर्षांत झाले आहे. सध्याचे सरकार हे खºया अर्थाने ‘सक्षम’ असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAmruta Fadnavisअमृता फडणवीस