शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

Ashadhi Wari: दिंडयांना २० हजार अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा, देवस्थानांकडून स्वागत, दिंड्यांचा विरोध

By विश्वास मोरे | Updated: June 17, 2024 20:01 IST

शासनाने दिंड्यांसाठी जाहीर केलेल्या अनुदानाबाबत काही वारकरी करत असलेला विरोध व्यक्तिगत आहे, देवस्थानची प्रतिक्रिया

पिंपरी : पंढरीची आषाढी वारी (Ashadhi Wari) समीप आली आहे. तर प्रशासकीय तयारी सुरु झाली आहे. राज्य शासनाने सोहळ्यातील तीन हजार दिंडयांना २० हजार अनुदानाची घोषणा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.  त्यावरून वारकरी संप्रदायात मत- मतांतरे सुरु झाली आहेत. आक्षेप -प्रति आक्षेप होऊ लागले आहेत. शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या  देवस्थानांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. तर 'अखंडपूर्ण वारीची वाट चालणाऱ्या संतांच्या पायिकांनी विरोध दर्शविला आहे. दिंड्याना अनुदान नको, वारी आणि तीर्थक्षेत्रावर सेवासुविधांचे सक्षमीकरण करा, तसेच काही दिंड्या अनुदान मिळतेय ते घ्या अशी संमिश्र भूमिका आणि सूर वारकरी संप्रदायातून उमटत आहे. "पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरि" वारी म्हणजे वारकरी संप्रदायाचा गाभा आणि विठ्ठलचरणी तल्लीन होऊन नाचत गात पंढरीच्या विठूरायाला भेटण्याची ओढ या वारकरी संप्रदायातल्या प्रत्येकाला असतेच. वारीची ओढ सुरु झाली आहे. स्थानिक प्रशासनापासून तर जिल्हा राज्य शासनाच्या वतीने सोहळ्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे बैठका सुरु झाल्या आहेत. त्यावेळी मुंबई येथील बैठकीत 'पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होते. 

 'भिक्षा पात्र अवलंबणे । जळो जिणे लाजिरवाणे॥' शासनाच्या २० हजार मदतीवर वारी म्हणजे वारी या भक्तीरसपूर्ण शब्दावर आणि परंपरेवरच आघात आहे. यामुळे निष्कामवारीपासून दिंडी आणि वारकरी दुरावणार आहे. पंढरीची वारी ही एक साधना आणि व्रत आहे. त्यामुळे पंढरीची वारी आहे माझे घरी, पण ती शासनाच्या २०हजारी उपकारावर, अशी लाजीरवाणी परिस्थिती निर्माण होणार आहे. स्वकमाईतून दिंडीला ५०० ते काही हजार त्या वारकऱ्याकडून भिशी दिली जाते.अनेक ठिकाणी दिंड्यांच्या पंगती ठरलेल्या असतात. अनेक ठिकाणी अन्नदात्यांकडून अन्नदान केले जाते. त्यामुळे पंढरीच्या वारकऱ्यांना या २० हजाराच्या मदतीची आवश्यकता नाही. तो निधी सरकाराने वारीच्या वाटेवर सोई सुविधांसाठी किंवा इतर मदतीसाठी खर्च करावा. खऱ्या आचार, विचार आणि उच्चार करणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्यांनी ही मदत स्विकारु नये. किंवा शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. -प्रशांत महाराज मोरे (संत तुकाराम महाराजांचे  ११ वे वंशज ) 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. नियोजना संदर्भात पुण्यात तसेच मुंबई येथे बैठक झाली. त्यामध्ये प्रशासनाची तयारी आणि शासनाकडून होणारे सहकार्य याबाबत माहिती देण्यात आली. शासनाने दिंड्यांसाठी जाहीर केलेल्या अनुदानाबाबत काही वारकरी विरोध करत आहेत, हा त्यांचा विरोध व्यक्तिगत आहे. वारी सोहळ्यास आणि दिंडयांना बळ देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे, ही चांगली बाब आहे. आम्ही निर्णयाचे स्वागत करतो. - पुरुषोत्तम महाराज मोरे (देहू देवस्थानचे अध्यक्ष ) 

अशा आहेत  वारकऱ्यांच्या अपेक्षा  

१) पालखी मार्ग रुंदीकरण काही भागात अपूर्ण आहे. पालखी तळ जागाचा प्रश्न आहे. जागांचा प्रश्न सोडवायला हवा. २) वारीमार्गावर आता वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची मोहीम, पर्यावरणाची वारी करण्याची गरज. निर्मलवारी संकल्पनेस बळ द्यायला हवे. वारीकाळात वैद्यकीय सुविधा सक्षम कराव्यात. ३) देहू, पंढरपूर आणि आळंदी या तीर्थ क्षेत्रमध्ये इंद्रायणी आणि चंद्रभागा नदी आहे. तिचे प्रदूषण थांबलेले नाही. प्रदूषण रोखण्याची गरज आहे.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीMONEYपैसाashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी