शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एसबीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 7:16 PM

1 / 10
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.
2 / 10
एसबीआयकडून स्वेच्छानिवृत्ती योजनेवर काम सुरू आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत एसबीआयच्या कर्मचाऱ्यांची संख्या २.४९ लाख इतकी होती. त्यातील ३० हजार कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी घरी बसावं लागू शकतं.
3 / 10
स्टेट बँक ऑफ इंडिया कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात करणार आहे. एकाच झटक्यात ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी एसबीआयनं सुरू केली आहे.
4 / 10
एसबीआयकडून स्वेच्छानिवृत्ती योजनेवर (व्हीआरएस) सध्या जोरात काम सुरू आहे. ही योजना लागू होताच ३० हजार १९० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
5 / 10
व्हीआरएससाठी एक आराखडा तयार करण्यात आला असून तो बोर्डाची मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.
6 / 10
एसबीआयनं प्रस्तावित व्हीआरएस योजनेला सेकंड इनिंग टॅप व्हीआरएस २०२० असं नाव दिलं आहे. जवळपास ३० हजार जणांना या योजनेच्या माध्यमातून नारळ दिला जाईल.
7 / 10
३० हजारांमध्ये ११ हजार ५६५ अधिकारी आणि १८ हजार ६२५ कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. याआधी २००१ मध्ये एसबीआयनं व्हीआरएस योजना आणली होती.
8 / 10
एसबीआयच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ३१ मार्च २०२० रोजी २.४९ लाख इतकी आहे. हाच आकडा मार्च २०१९ मध्ये २.५७ लाख इतका होता.
9 / 10
खर्च कमी करण्यासाठी एसबीआयनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन हजार कोटी रुपये वाचतील, असा बँकेचा अंदाज आहे.
10 / 10
जवळपास ३० हजार कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस योजना तयार केली जात आहे. यातील किमान ३० टक्के कर्मचाऱ्यांनी योजनेला प्रतिसाद दिल्यास जुलै २०२० च्या त्यांच्या वेतनाच्या आधारे बँकेचे १ हजार ६६२ कोटी रुपये वाचतील.
टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया