"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:05 IST
1 / 7एअर इंडियाच्या विमान अपघातात अनेकांनी आपले जीवलग गमावले. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात फाल्गुनीने आपले वडील गमावले.2 / 7अहमदाबादमधील रुग्णालयाबाहेर ती वडिलांचे पार्थिव मिळण्याची वाट बघतेय. वडिलांचा मृत्यू झाल्याचे कळल्यापासून तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत.3 / 7मृतांच्या कुटुंबीयांना एअर इंडिया एक कोटींची मदत देणार आहे, असे जेव्हा तिला सांगितले. तेव्हा तिच्या संतापाचा कडेलोट झाला. ती म्हणाली, 'कुणीतरी मला सांगा की, माझ्या वडिलांची चूक काय होती? मला माझे वडील परत द्या. एअर इंडियाने मस्करी चालवली आहे. कोणतेही उत्तर नाही, कोणताही संवेदनशीलपणा नाही.'4 / 7रडत रडतच फाल्गुनी म्हणाली, 'एक कोटी देणार असल्याचे सांगत आहेत. मी दोन कोटी देते, पण, त्यांनी माझे वडील परत आणू द्यावेत. पैशाने व्यक्ती विकत घेतला जाऊ शकतो का?'5 / 7'आम्ही त्या पैशातून पलंग खरेदी करू, पण त्यावर आम्हाला झोप लागेल का? जे प्रेम माझे वडील मला द्यायचे, ते कुठे मिळेल? माझे वडील देशभक्त होते. त्यांना एअर इंडियाचा अभिमान वाटायचा. ते म्हणायचे एअर इंडिया आमचा अभिमान आहे. देशाची शान आहे', असे फाल्गुनी अश्रूंना वाट मोकळी करून देताना म्हणाली.6 / 7'माझ्या वडिलांना देशप्रेमाचे बक्षीस काय मिळाले? देशाचे नाव असे चालवणार का? जर तुम्हाला सुरक्षितपणे विमान चालवता येत नसतील, तर एअर इंडिया बंद करा. ही काही मस्करी नाहीये. जीवापेक्षा महत्त्वाचं काहीच नाहीये', असा संताप तिने व्यक्त केला.7 / 7एअर इंडिया अपघातात तब्बल २६६ जणांचा मृत्यू झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. विमानाच्या जळलेल्या मलब्याखाली आणखी काही मृतदेह आहेत का, याचा शोधही श्वानांच्या मदतीने घेतला जात आहे. या घटनेने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.