शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केरळात महापूर - जनजीवन विस्कळीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 6:18 PM

1 / 7
केरळमध्ये बुधवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीनव विस्कळीत झाले असून आतापर्यंत 29 जणांचा बळी गेला आहे.
2 / 7
आशियातील सर्वांत मोठे वक्राकार धरण म्हणून नावाजलेले केरळमधील इडुक्की धरण पावसामुळे भरुन वाहू लागल्याने धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.
3 / 7
तब्बल 40 वर्षांत पहिल्यांदाच केरळमध्ये अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी भूसख्खलनही झाले आहे.
4 / 7
मुसळधार पावसाचा राज्यातील सहा जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला असून, मदतकार्यासाठी तीनही सेनादलांना पाचारण करण्यात आले आहे.
5 / 7
प्रचंड पावसामुळे वयानड जिल्ह्यामध्ये दरडी कोसळून त्याचा इतर भागांशी संपर्क तुटलेला आहे. तेथील तब्बल 10,400 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
6 / 7
केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, अनेकजण पाण्यातून जीव वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.
7 / 7
मुख्यमंत्री विजयन यांनी हवाई दौरा करुन केरळमधील पूरस्थितीची पाहणी केली. तर केरळ पोलिसांनी चक्क खांद्यापर्यंत पाण्यात भिजून आपली ड्युटी बजावली.
टॅग्स :KeralaकेरळRainपाऊस