ज्येष्ठ काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे वयाच्या ७७व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहणारे देवरांचे सगळ्या पक्षांच्या नेत्यांशी सौहार्दाचे संबंध होते.केंद्रीय विद्यालयांमध्ये जर्मनीच्या ऐवजी संस्कृत शिकवण्याच्या स्मृती इराणींच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. जर्मनीच्या चॅन्सेलर मर्केल यांनीदेखील नाराजी व्यक्त केली.स्वयंघोषित धर्मगुरू रामपालला अखेर पोलीसांनी अटक केली खुनाच्या आरोपाच्या एका जुन्या खटल्याच्या सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याचे समन धुडकावणा-या व शेकडो हिंसक पाठिराख्यांचे पाठबळ असलेल्या रामपालला अटक करून कायदा सगळ्यांसाठी समान असल्याचे दिसून आले.हायकोर्टाने मराठा व मुस्लीमांना आरक्षण देण्याच्या राज्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. केवळ मुस्लीमांना शिक्षणामध्ये आरक्षण देता येईल असे स्पष्ट केलेगुजरातने स्थानिक निवडणुकांमध्ये मतदान सक्तीचे करणारा कायदा केला. अर्थात मतदान न करणा-यांना काय जेलमध्ये टाकणार का अशी टीका खुद्द निवडणूक आयुक्त ब्रह्मा यांनीच केली.गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे संरक्षण खाते सोपवण्यात आले. स्वच्छ चारित्र्याचे आणि निर्णयक्षम अशी प्रतिमा असलेल्या पर्रीकरांनी संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.वाघा बॉर्डरच्या पाकिस्तानच्या भागात एका दहशतवाद्याने २५ किलो वजनाच्या बाँबचे स्फोट घडवले आणि ५५ जणांचा बळी घेतला तर २०० जण जखमी झाले. लष्कराचा फ्लॅग सेरेमनी बघून परतत असलेले नागरिक या हल्ल्याचे बळी ठरले.सचिन तेंडुलकरच्या इट्स प्लेइंग माय वे या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तकाने प्रकाशनपूर्व विक्रीचा उच्चाक गाठताना एक कोटीचा पल्ला पार केला. अर्थात ग्रेग चॅपेलनी राहूल द्रविडला कप्तानपदावरून काढण्याचे व सचिनला कप्तान बनवण्याचा डाव आखल्याचा गौप्यस्फोट सचिननं केला याचीच खमंग चर्चा रंगली.इस्लामिक स्टेटचा जिहादी बनत इराकमध्ये गेलेला अरीब मजिद हा कल्याणचा तरूण भारतात परतला. त्याला राष्ट्रीय तपास पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले.एका स्थानिक सामन्यात अॅबॉटचा बाउन्सर डोक्यावर आदळल्याने फिल ह्युज या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाचा मृत्यू झाला आणि क्रीडाविश्वात खळबळ उडाली. अत्यंत धक्का बसलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचा भारताशी होणारा पहिला सामना पुढे ढकलण्यात आला.विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलेल्या शिवसेनेचे अखेर भाजपाशी सुरू झालेल्या चर्चेचे गु-हाळ अखेर संपले आणि शिवसेना सत्तेत सहभागी झाली.