शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वडिलाने सावत्र मुलीसोबत जबरदस्ती केलं तिसरं लग्न, अफेअरचा आला संशय तर केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 11:49 AM

1 / 5
वडील हे घराचा सर्वात मोठा आधार असतात. असं मानलं जातं की, वडील असले तर घरातील सर्व सदस्य सुरक्षित राहतात. खासकरून मुली वडिलांना आपल्या सुरक्षेसाठी जास्त सुरक्षित मानतात. पण बिहारच्या अरवलमध्ये एका वडिलांनीच पवित्र नात्याला काळिमा फासली आहे. त्याने केवळ आपल्या सावत्र मुलीसोबत लग्नच केलं नाही तर अनैतिक संबंधाच्या संशयातून त्याने तिची हत्याही केली.
2 / 5
ही घटना आहे जलपुरा गावातील. इथे राहणाऱ्या मक्केश्वर कहारने जबरदस्ती आपल्या सावत्र मुलीसोबत लग्ने केलं. बरेच वर्ष सोबत राहिल्यानंतर एक दिवस महिलेने त्याच्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलीसोबत महिला वासिलपूरमध्ये भाड्याच्या घरात राहू लागली.
3 / 5
मक्केश्वर कहारला संशय होता की, पत्नीचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध सुरू आहे. ज्यावर तो नाराज होता आणि रागात त्याने तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केली. महिलेच्या मुलीने सांगितलं की, रविवारी तिची आई कपडे आणि काही वस्तू घेण्यासाठी घरी आली होती. यादरम्यान ती कपडे घेऊन जातच होती की, वडिलांनी तिच्या आईवर गोळी झाडून तिची हत्या केली.
4 / 5
या घटनेची सूचना लगेच परिसरात पसरली. आरोपी मक्केश्वर कहार हत्या करून फरार होण्याचा प्रयत्न करत होता. पण काही पोलिसांनी त्याला एका शेतात शस्त्रासोबत धरलं. पोलिसांनी त्याच्याकडून शस्त्र ताब्यात घेतलं. तेच घटनास्थळी पोलिसांनी गोळीचा रिकामा बॉक्सही सापडला.
5 / 5
एसपी राजीव रंजन यांनी सांगितलं की, आरोपी मक्केश्वर कहारने तीन लग्ने केली होती. त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. तर त्याची दुसरी पत्नी त्याला सोडून गेली होती. ज्यानंतर त्याने त्याच्या सावत्र मुलीसोबत जबरदस्ती लग्न केलं होतं. एसपी म्हणाले की, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी