शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वास्तुमध्ये 'या' अशुभ गोष्टी तुमच्या सुख समृध्दीच्या आड येत आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 4:23 PM

1 / 5
घड्याळ आपल्याला वेळ दर्शवते. पुढचा काळ दाखवते. मात्र ते बंद पडले असेल, तर काळ आणि परिस्थितीदेखील स्थगित झाल्यासारखी होते. म्हणून घरात बंद पडलेले घड्याळ अजिबात ठेवू नका. तुमचे नशीब थांबून राहील. अपयशाचा काळ संपणार नाही. म्हणून बंद पडलेले घड्याळ दुरुस्त करून घ्या अन्यथा टाकून द्या.
2 / 5
आपल्या धनाचे, घराचे, कागदपत्राचे एवढेच काय, तर प्रवासात सामानाचे संरक्षण करण्यासाठी आपण कुलूपाची मदत घेतो. जेव्हा भाग्योदय होतो, तेव्हा नशीबाचे टाळे उघडले असे आपण म्हणतो. अशी कुलूपासारखी सामान्य परंतु अतिशय महत्त्वाची वस्तू बंद पडलेली असेल, तर ती घरात ठेवू नका. तुमच्या करिअरला कुलूप लागेल आणि प्रगती थांबेल.
3 / 5
अडगळ करण्याची सवय आपल्याला घातक ठरते. नवीन जोडे घेऊनसुद्धा जुन्या, तुटलेल्या चपलांमध्ये आपला जीव अडकलेला असतो. कधीतरी कामी येतील म्हणत चपलांची पोती प्रत्येक घराच्या कोपऱ्यात पडून असतात. परंतु वास्तुशास्त्र सांगते, झिजलेल्या चपला हे आपण केलेल्या संघर्षाचे प्रतीक आहेत. त्यांचा वापर झाला की टाकून द्या, अन्यथा तुमच्या आयुष्यातील संघर्ष वाढेल.
4 / 5
आताची परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. पूर्वी दसरा दिवाळीला नव्या कपड्यांची खरेदी केली जात असे. आता बारमाही शॉपिंग सुरू असते. कपाटात ठेवायला जागा नाही, एवढा कपड्यांचा ढीग आपल्याकडे असतो, तरीदेखील जुन्या कपड्यांची वेळीच विल्हेवाट लावली जात नाही. जुने फाटके कपडे दुर्भाग्य दर्शवतात. ते जमवून ठेवल्याने घरातून दुर्भाग्य जाण्याचे नाव घेत नाही.
5 / 5
देवी देवतांच्या फोटोतून आपल्याला सकारात्मकता जाणवते. परंतु, ठराविक काळानंतर फोटो खराब स्थितीत झाले असता ते विसर्जित करावेत. तसेच देवांची भग्न पावलेली मूर्ती देवघरात न ठेवता नदीत विंâवा समुद्रात विसर्जित करावी. भग्न मूर्ती पाहून आपल्या मनात नकारात्मक भाव जागृत होतात आणि आपल्याला प्रसन्न वाटत नाही, म्हणून त्यात वेळोवेळी आवश्यक बदल केले पाहिजेत.