शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

बलसा गावात १२ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान; जिल्हाधिऱ्यांच्या चर्चेनंतर बहिष्कार मागे

By राजन मगरुळकर | Published: April 26, 2024 12:20 PM

गावाच्या परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवावा, यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.

परभणी : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला शुक्रवारी सकाळी सात वाजता जिल्ह्यात सुरुवात झाली. मात्र, परभणी शहराजवळ खानापूरलगत असलेल्या बलसा खू. या पुनर्वसित गावामध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत एकही ग्रामस्थांनी मतदान केले नाही. 

गावाच्या परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवावा, यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. हा प्रकार समजतात तत्काळ जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे हे वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्यांसह गावामध्ये दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढून विविध प्रश्नाबाबत लेखी पत्र देऊन समस्या सोडविण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. मतदान हा मूलभूत हक्क असून तो आपण बजावावा असे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी सदरील आश्वासनानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले. 

या गावातील पाणी, वीज सोबतच मूलभूत समस्यांच्या प्रश्नावरही ग्रामस्थांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे साकडे घातले व समस्या मांडल्या. गावाच्या परिसरात होणारे वीज चोरी, विजेचे आकडे याबाबत सुद्धा प्रशासनाने पाऊल उचलावे अशी मागणी ही ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्यासह निवडणूक निरीक्षक, फिरते पथक आणि मतदान केंद्राचे विविध पथक गावामध्ये आले होते.

अखेर बहिष्कार मागे ग्रामस्थांनी गावातील ग्रामपंचायत समोर उद्घोषणा करून मतदान बहिष्कार मागे घेतल्याचे आता जाहीर केले. त्यानंतर पहिला मतदार केंद्रावर दाखल झाला आहे. आता ग्रामस्थ येथून रवाना होऊन मतदान केंद्रावर मतदानासाठी येत आहेत.

टॅग्स :parbhani-pcपरभणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४