शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यासाठी पाण्याचा विसर्ग; ८ आवर्तने मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 12:37 IST

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे परभणी जिल्ह्यासाठी आठ आवर्तन मंजूर करण्यात आले असून शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देजायकवाडीच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत, परभणी आणि पूर्णा तालुक्यांचा भाग येतो.डाव्या कालव्याच्या कि.मी. १२२ ते २०८ लाभक्षेत्रात व त्यावरील वितरण प्रणालीत पाणी सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांकडून करण्यात येत होती.सध्या रबी हंगामासाठी चार आवर्तन तसेच उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तन अशा एकूण ८ आवर्तनास जलसंपदा मंत्र्यांची मंजुरी

परभणी :जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे परभणी जिल्ह्यासाठी आठ आवर्तन मंजूर करण्यात आले असून शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. पाथरी भागात रविवारी रात्रीपर्यंत हे पाणी दाखल होणार आहे. 

पैठण येथील जायकवाडी धरण यावर्षी १०० टक्के भरले आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत, परभणी आणि पूर्णा तालुक्यांचा भाग येतो. डाव्या कालव्याच्या कि.मी. १२२ ते २०८ लाभक्षेत्रात व त्यावरील वितरण प्रणालीत पाणी सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांकडून करण्यात येत होती. जायकवाडीच्या पाणी वाटपासंदर्भात मुंबई येथे १३ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक होऊन परभणी जिल्ह्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाला.

सध्या रबी हंगामासाठी चार आवर्तन तसेच उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तन अशा एकूण ८ आवर्तनास मंजुरी देण्यात आली असून ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांनी पाणी अर्जाची मागणी करावी, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्याला डाव्या कालव्यात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले  आहे. प्रती घंटा २०० क्युसेसने यात वाढ केली जाणार असून पैठण येथून सोडण्यात आलेले पाणी १९ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत परभणी जिल्ह्यात पाथरी भागातील कालवा १२२ वर दाखल होईल. पहिल्या आवर्तनाची वाट पाहणाºया शेतकºयांना रबी पेरणी तसेच खरिपातील पिकांसाठी याचा लाभ होणार आहे. 

नियोजनाचा अभावपरभणी जिल्ह्यासाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असले तरी सुुरुवातीच्या काळात कराव्या लागणा-या नियोजनाचा पूर्णत: अभाव दिसून येत आहे. १६ नोव्हेंबर रोजी पाणी नियोजनासंदर्भात जायकवाडीच्या परभणी येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेली बैठक अंतर्गत वाद-विवादाने रद्द झाली. यामुळे पाणी नियोजन रखडल्या गेल्याने जिल्ह्यातील रबी हंगामाला याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

एकच उपअभियंताजायकवाडी विभाग क्रमांक २ अंतर्गत सहा उपविभाग आहेत. तसेच सात उपअभियंत्याची पदे उपलब्ध असताना एकच उपअभियंता सध्या कार्यरत आहे. त्यामुळे उपविभागाचा पदभार शाखा अभियंत्याकडे असल्याने ऐन हंगामाच्या तोंडावर नियोजन विस्कटल्याचे दिसून येत आहे.

पाथरी येथील पदही रिक्तपाथरी येथे जायकवाडीचे उपविभागीय कार्यालय असून या कार्यक्षेत्रांतर्गत पाथरी, मानवत तालुक्यांचा भाग येतो. येथील उपअभियंता पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त आहे. शाखा अभियंता डी.बी. खारकर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला  आहे. 

रबी हंगामातील पिकांसाठी फायद्याचे जायकवाडी धरणातून कालवा लाभक्षेत्रातील १२२ ते २०८ कालव्यावर रबी हंगामासाठी चार आवर्तन मंजूर करण्यात आले असून शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. रबी हंगामातील पिकांसाठी शेतक-यांनी संबंधित सिंचन शाखेकडे मागणी अर्ज करून पाण्याचा लाभ घ्यावा. तसेच हे पाणी शेतक-यांसाठी लाभदायक ठरणार आहे. - आ. मोहन फड, मतदार संघ,पाथरी 

शेतक-यांकडून अर्ज प्राप्त जायकवाडीच्या डाव्या कालव्यात पैठण येथील धरणातून आज पाणी सोडण्यात आले असून येत्या दोन दिवसात २२०० क्युसेसने पाणी या भागात दाखल होणार आहे. शेतक-यांकडून पाण्यासाठी मागणी अर्ज भरून घेतले जात आहेत. - डी.बी. खारकर, शाखा अभियंता, पाथरी

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणparabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकार