शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यासाठी पाण्याचा विसर्ग; ८ आवर्तने मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 12:37 IST

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे परभणी जिल्ह्यासाठी आठ आवर्तन मंजूर करण्यात आले असून शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देजायकवाडीच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत, परभणी आणि पूर्णा तालुक्यांचा भाग येतो.डाव्या कालव्याच्या कि.मी. १२२ ते २०८ लाभक्षेत्रात व त्यावरील वितरण प्रणालीत पाणी सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांकडून करण्यात येत होती.सध्या रबी हंगामासाठी चार आवर्तन तसेच उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तन अशा एकूण ८ आवर्तनास जलसंपदा मंत्र्यांची मंजुरी

परभणी :जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे परभणी जिल्ह्यासाठी आठ आवर्तन मंजूर करण्यात आले असून शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. पाथरी भागात रविवारी रात्रीपर्यंत हे पाणी दाखल होणार आहे. 

पैठण येथील जायकवाडी धरण यावर्षी १०० टक्के भरले आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत, परभणी आणि पूर्णा तालुक्यांचा भाग येतो. डाव्या कालव्याच्या कि.मी. १२२ ते २०८ लाभक्षेत्रात व त्यावरील वितरण प्रणालीत पाणी सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांकडून करण्यात येत होती. जायकवाडीच्या पाणी वाटपासंदर्भात मुंबई येथे १३ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक होऊन परभणी जिल्ह्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाला.

सध्या रबी हंगामासाठी चार आवर्तन तसेच उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तन अशा एकूण ८ आवर्तनास मंजुरी देण्यात आली असून ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांनी पाणी अर्जाची मागणी करावी, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्याला डाव्या कालव्यात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले  आहे. प्रती घंटा २०० क्युसेसने यात वाढ केली जाणार असून पैठण येथून सोडण्यात आलेले पाणी १९ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत परभणी जिल्ह्यात पाथरी भागातील कालवा १२२ वर दाखल होईल. पहिल्या आवर्तनाची वाट पाहणाºया शेतकºयांना रबी पेरणी तसेच खरिपातील पिकांसाठी याचा लाभ होणार आहे. 

नियोजनाचा अभावपरभणी जिल्ह्यासाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असले तरी सुुरुवातीच्या काळात कराव्या लागणा-या नियोजनाचा पूर्णत: अभाव दिसून येत आहे. १६ नोव्हेंबर रोजी पाणी नियोजनासंदर्भात जायकवाडीच्या परभणी येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेली बैठक अंतर्गत वाद-विवादाने रद्द झाली. यामुळे पाणी नियोजन रखडल्या गेल्याने जिल्ह्यातील रबी हंगामाला याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

एकच उपअभियंताजायकवाडी विभाग क्रमांक २ अंतर्गत सहा उपविभाग आहेत. तसेच सात उपअभियंत्याची पदे उपलब्ध असताना एकच उपअभियंता सध्या कार्यरत आहे. त्यामुळे उपविभागाचा पदभार शाखा अभियंत्याकडे असल्याने ऐन हंगामाच्या तोंडावर नियोजन विस्कटल्याचे दिसून येत आहे.

पाथरी येथील पदही रिक्तपाथरी येथे जायकवाडीचे उपविभागीय कार्यालय असून या कार्यक्षेत्रांतर्गत पाथरी, मानवत तालुक्यांचा भाग येतो. येथील उपअभियंता पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त आहे. शाखा अभियंता डी.बी. खारकर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला  आहे. 

रबी हंगामातील पिकांसाठी फायद्याचे जायकवाडी धरणातून कालवा लाभक्षेत्रातील १२२ ते २०८ कालव्यावर रबी हंगामासाठी चार आवर्तन मंजूर करण्यात आले असून शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. रबी हंगामातील पिकांसाठी शेतक-यांनी संबंधित सिंचन शाखेकडे मागणी अर्ज करून पाण्याचा लाभ घ्यावा. तसेच हे पाणी शेतक-यांसाठी लाभदायक ठरणार आहे. - आ. मोहन फड, मतदार संघ,पाथरी 

शेतक-यांकडून अर्ज प्राप्त जायकवाडीच्या डाव्या कालव्यात पैठण येथील धरणातून आज पाणी सोडण्यात आले असून येत्या दोन दिवसात २२०० क्युसेसने पाणी या भागात दाखल होणार आहे. शेतक-यांकडून पाण्यासाठी मागणी अर्ज भरून घेतले जात आहेत. - डी.बी. खारकर, शाखा अभियंता, पाथरी

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणparabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकार