शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

प्रयोगशील शेतीला विपणनाची जोड देऊन दुष्काळावर केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:36 IST

आगामी काळात फुलांच्या नवीन जातीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.

मानवत : तालुक्यातील शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ, कमी बाजारभाव, तोट्याची शेती या नकारात्मक परिस्थितीला आधुनिकीकरण व प्रयोगशीलतेची जोड देऊन पूर्णपणे बदलले आहे. शेडनेट व पॉलीहाऊसमध्ये गुलाब शेती करुन उत्तम मार्केटिंग, रेशीम शेती, शेततळी, शेतीगट यातून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करुन उत्पन्न वाढीसाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.

तालुक्यातील मंगरुळ हे पाथरी- पोखर्णी रस्त्यावरील साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय. पारंपरिक पिकांमुळे शेती व्यवसाय तोट्यात येत असल्याने गावातील तरुण रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होऊ लागले. २०१६ पासून शेतकऱ्यांनी आधुनिकीकरणाची व प्रयोगशीलतेची कास धरत गाव शिवाराचे चित्रच बदलून टाकले आहे. पारंपारिक पिकांऐवजी गुलाब शेतीला सुरुवात केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येत जय मल्हार शेतकरी गटाची नोंदणी केली. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान मिळविले. २०१६-१७ साली १० शेतकऱ्यांनी प्रत्येकी २० गुंठे या प्रमाणे शेडनेट उभारुन डच गुलाबांची लागवड केली होती. सध्या वर्षभर डच फुलांचे उत्पादन शेतकरी घेतात. शेतकऱ्यांनी स्वत: पॅकिंगचे कौशल्य विकसित करीत आपली नागपूर, पुणे, नांदेड आदी ठिकाणी फुले पाठवून योग्य दर प्राप्त केला आहे.शेडनेट शेतीचे अर्थकारण पटल्यानंतर १० पॉलीहाऊस शेतशिवारात उभी राहिली. त्याच बरोबर ३० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यास सुरुवात केली.  

बंगरुळ येथे रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. शेतात १५ हून अधिक शेततळे निर्माण करण्यात आले आहेत. यामुळे शाश्वत सिंचनाची सोय झाली आहे. शिवाय शेततळ्यात मत्स्य बीज सोडून उत्पन्न घेतले जाते. मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्स्फसरिंगद्वारे मंगरुळ येथील मोहन कापसे यांच्याशी चर्चा करुन प्रकल्पाचीे माहिती दिली. या सर्व  कार्यात कृषी विभागाने मोलाचे सहकार्य केले आहे. नुकतेच प्रजासत्ताकदिनी कृषी सहाय्यक भास्कर शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मंगरुळ या गावाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली प्रगती अन्य गावांना पथदर्शक ठरावी, अशीच आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरमानवत तालुक्यातील मंगरुळ येथे सध्या पॉलीहाऊसमध्ये ९ शेतकरी डच गुलाबाचे उत्पादन घेतात. शेडनेटच्या माध्यमातून १० शेतकरीही गुलाबाचेच उत्पादन घेतात. तर ३० शेतकरी रेशीम उत्पादक आहेत. १५ शेतकरी हे शेततळ्यात मत्स्यबीज सोडून मत्स्य व्यवसाय करतात. आगामी काळात फुलांच्या नवीन जातीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र