शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

प्रयोगशील शेतीला विपणनाची जोड देऊन दुष्काळावर केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:36 IST

आगामी काळात फुलांच्या नवीन जातीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.

मानवत : तालुक्यातील शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ, कमी बाजारभाव, तोट्याची शेती या नकारात्मक परिस्थितीला आधुनिकीकरण व प्रयोगशीलतेची जोड देऊन पूर्णपणे बदलले आहे. शेडनेट व पॉलीहाऊसमध्ये गुलाब शेती करुन उत्तम मार्केटिंग, रेशीम शेती, शेततळी, शेतीगट यातून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करुन उत्पन्न वाढीसाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.

तालुक्यातील मंगरुळ हे पाथरी- पोखर्णी रस्त्यावरील साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय. पारंपरिक पिकांमुळे शेती व्यवसाय तोट्यात येत असल्याने गावातील तरुण रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होऊ लागले. २०१६ पासून शेतकऱ्यांनी आधुनिकीकरणाची व प्रयोगशीलतेची कास धरत गाव शिवाराचे चित्रच बदलून टाकले आहे. पारंपारिक पिकांऐवजी गुलाब शेतीला सुरुवात केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येत जय मल्हार शेतकरी गटाची नोंदणी केली. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान मिळविले. २०१६-१७ साली १० शेतकऱ्यांनी प्रत्येकी २० गुंठे या प्रमाणे शेडनेट उभारुन डच गुलाबांची लागवड केली होती. सध्या वर्षभर डच फुलांचे उत्पादन शेतकरी घेतात. शेतकऱ्यांनी स्वत: पॅकिंगचे कौशल्य विकसित करीत आपली नागपूर, पुणे, नांदेड आदी ठिकाणी फुले पाठवून योग्य दर प्राप्त केला आहे.शेडनेट शेतीचे अर्थकारण पटल्यानंतर १० पॉलीहाऊस शेतशिवारात उभी राहिली. त्याच बरोबर ३० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यास सुरुवात केली.  

बंगरुळ येथे रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. शेतात १५ हून अधिक शेततळे निर्माण करण्यात आले आहेत. यामुळे शाश्वत सिंचनाची सोय झाली आहे. शिवाय शेततळ्यात मत्स्य बीज सोडून उत्पन्न घेतले जाते. मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्स्फसरिंगद्वारे मंगरुळ येथील मोहन कापसे यांच्याशी चर्चा करुन प्रकल्पाचीे माहिती दिली. या सर्व  कार्यात कृषी विभागाने मोलाचे सहकार्य केले आहे. नुकतेच प्रजासत्ताकदिनी कृषी सहाय्यक भास्कर शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मंगरुळ या गावाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली प्रगती अन्य गावांना पथदर्शक ठरावी, अशीच आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरमानवत तालुक्यातील मंगरुळ येथे सध्या पॉलीहाऊसमध्ये ९ शेतकरी डच गुलाबाचे उत्पादन घेतात. शेडनेटच्या माध्यमातून १० शेतकरीही गुलाबाचेच उत्पादन घेतात. तर ३० शेतकरी रेशीम उत्पादक आहेत. १५ शेतकरी हे शेततळ्यात मत्स्यबीज सोडून मत्स्य व्यवसाय करतात. आगामी काळात फुलांच्या नवीन जातीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र