शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

सन्मान, स्वीकार, सामंजस्य त्रिसूत्रीचा वापर करा- आनंद नाडकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:52 AM

पालक आणि पाल्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी सन्मान, स्वीकार व सामंजस्य या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ़आनंद नाडकर्णी यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालक आणि पाल्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी सन्मान, स्वीकार व सामंजस्य या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ़आनंद नाडकर्णी यांनी केले़येथील साद मैत्रीची या १९९१ च्या माजी विद्यार्थ्यांच्या गु्रपने नाडकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते़ बाल विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणात आयोजित या व्याख्यानास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ डॉ़ नाडकर्णी म्हणाले, सुसंवादासाठी दोन्ही घटकांचे वर्तन सामंजस्यपूर्ण असणे गरजेचे आह़े़ परिवारात एखाद्या मुद्यावर मतभेद असू शकतात़ परंतु, व्यक्तींमध्ये मनभेद असता कामा नये, पाल्यांना सर्व माहिती जाणून घेण्यासाठी पालकांनी प्रोत्साहित केले पाहिजे़ मुलांच्या आवडीप्रमाणे कल आणि बुद्धीमत्तेनुसार एखाद्या विशिष्ट विषयाचे सखोल ज्ञान मिळवून मुलांचे करिअर घडविण्याची मुभा पालकांनी त्यांना द्यावी़ मोबाईलचा वापर शिक्षण आणि ज्ञानरंजनासाठी करण्यावर भर द्यावा़ खूप पैसा कमावणे हे चुकीचे नाही; परंतु, कमावलेल्या पैशाचा सदुपयोग होणे व तो सदुपयोग कसा करायचा? हे कळणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले़ कार्यक्रमास मुख्याध्यापक ए़यू़ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी पालक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न प्रातिनिधीक स्वरुपात भूषण घोडके यांनी मांडल्या़ सम्यक घोडके या विद्यार्थ्याने पाल्यांचे प्रतिनिधीत्व केले़ प्रा़डॉ़ गिरीष कौसडीकर यांनी सूत्रसंचालन केले़ अतुल करमाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला़ अरुण टाक यांनी आभार मानले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी साद मैत्रीची या समूहाच्या सदस्यांनी प्रयत्न केले़

टॅग्स :parabhaniपरभणीMobileमोबाइल