शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अनावश्यक शस्त्र परवान्यांनी गुन्हेगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST

मागील काही वर्षांमध्ये शस्त्र परवाने घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बंदूक, तलवार यासह इतर शस्त्रांसाठी अधिकृत परवाना घेतला जातो. परंतु, ...

मागील काही वर्षांमध्ये शस्त्र परवाने घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बंदूक, तलवार यासह इतर शस्त्रांसाठी अधिकृत परवाना घेतला जातो. परंतु, या परवानाधारक शस्त्राचा योग्य वापर होतो का? स्वत:च्या सुरक्षेसाठी परवाना दिला असताना इतरांना हानी पोहोचेल या पद्धतीने शस्त्राचा वापर होतो का, याविषयी पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरवर्षी दिलेल्या शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण केले जाते. शस्त्र परवाना ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे तेथील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून या परवान्यांची पडताळणीही करण्यात येते. मात्र मागच्या काही दिवसांपासून वाढलेल्या गुन्हेगारी घटना आणि त्यात होणारा शस्त्रांचा वापर पाहता परवान्यांची पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक अनावश्यक व्यक्तींना शस्त्र परवाने दिल्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे शस्त्र परवाने देताना नियमांचे काटेकोर पालन करीत आवश्यक असणाऱ्यांनाच परवाना देणे गरजेचे झाले आहे.

त्या घटनेतील शस्त्र परवानाधारक होते का?

मागील आठवड्यात शहरातील दर्गा रोड भागात हवेत गोळीबार करण्याची घटना घडली होती. हा गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने ज्या बंदुकीतून गोळीबार केला, त्या बंदुकीस परवाना होता का, याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात परवानाधारक व्यक्ती शस्त्रांचा कुठे वापर करू शकतो, स्वत:च्या सुरक्षिततेसाठीच शस्त्राचा वापर झाला का, या बाबींची पडताळणी करणेही गरजेचे झाले आहे.

नियम कडक करण्याची आवश्यकता

शस्त्र परवाने घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने परवाने देताना नियम अधिक कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अनावश्यक व्यक्तींना शस्त्र परवाने दिल्यास गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढू शकतात, ही बाब लक्षात घेऊन शस्त्र परवाना देण्यासाठी आणखी कडक नियम करण्याची गरज आहे.

शस्त्रांचा वाढला वापर

जिल्ह्यात मागील काही महिन्यांमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींविरुद्धही पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. रात्रीच्या सुमारास शस्त्र हातात घेऊन फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विनापरवानगी शस्त्रे येतात कुठून? हे शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींचा नेमका उद्देश काय, याविषयी कसून तपासणी करण्याची गरज आहे.