शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृती पथकाला गावातून पिटाळून लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:29 IST

कर्जमाफीसाठी आंदोलनास बसलेल्या खडकवाडी येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या आक्रमकपणाचा सामना मतदान प्रक्रियेची जनजागृती करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना १८ सप्टेंबर रोजी करावा लागला. या विधानसभा निवडणुकीत मतदान करायचे नाही, असे सांगून कर्मचाºयांच्या पथकाला शेतकºयांनी पिटाळून लावले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत(परभणी) : कर्जमाफीसाठी आंदोलनास बसलेल्या खडकवाडी येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या आक्रमकपणाचा सामना मतदान प्रक्रियेची जनजागृती करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना १८ सप्टेंबर रोजी करावा लागला. या विधानसभा निवडणुकीत मतदान करायचे नाही, असे सांगून कर्मचाºयांच्या पथकाला शेतकºयांनी पिटाळून लावले.तालुक्यातील खडकवाडी येथील शेतकºयांनी गावातील हनुमान मंदिरात ३१ आॅगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. राज्य शासनाने दीड लाख रुपयांपर्यंत शेतकºयांची कर्जमाफी जाहीर केली आहे; परंतु, ज्या शेतकºयांकडे दीड लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज आहे, अशा शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ होणे अपेक्षित असताना बँक प्रशासनाच्या वतीने विशिष्ट रक्कम भरण्यासाठी सांगितले जात असल्याचा आरोप आंदोलक शेतकºयांनी केला आहे.खडकवाडी येथील आंदोलकांची लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाºयांनी भेट घेतली. मात्र तोडगा न निघाल्याने १८ सप्टेंबर रोजी म्हणजेच १८ व्या दिवशीही आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन सुरु असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ईव्हीएम मशीनवर मतदान कसे करायचे? याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तहसील कार्यालयाचे पथक दुपारी १२ वाजता खडकवाडी गावात दाखल झाले.पथकातील कर्मचाºयांनी गावातील हानुमान मंदिरासमोर एका टेबलवर ईव्हीएम मशीन ठेऊन ग्रामस्थांना प्रात्याक्षिक दाखविण्यासाठी बोलविण्यात आले. मात्र कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करणाºया ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत हे प्रात्यक्षिक बंद पाडले. फसव्या कर्जमाफीबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे अधिकाºयांना सांगितले. आंदोलनकर्त्या शेतकºयांचा आक्रमक पवित्रा पाहून तहसील कार्यालयाच्या पथकाने काढता पाय घेतला.मत मागायला येणाºयांना तुडवा : राजू शेट्टी यांचे आवाहन४तालुक्यातील खडकवाडी येथे संपूर्ण कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या आंदोलनास्थळी १७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी भेट घेतली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश फोफळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, तालुकाध्यक्ष हनुमान मसलकर उपस्थित होते.४यावेळी बोलताना गेल्या तीन वर्षापासून हे सरकार शेतकºयांच्या भावनांशी खेळत असून शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. शेतकºयांना बँकेचे निल प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत मतदान मागण्यासाठी येणाºयांना तुडवा, असे वादग्रस्त विधान केले.तीन गावांत आंदोलन सुरू४ तालुक्यातील सावळी, जंगमवाडी, नागरजवळा येथील शेतकºयांनी आपापल्या गावातील मारोती मंदिरात धरणे आंदोलन सुरु केले आहे. खडकवाडी येथे सुरु झालेल्या आंदोलनाचा वाणवा आता इतर गावात पसरत आहे.४लवकरच तालुक्यातील इतर काही गावात देखील धरणे आंदोलन सुरु होणार असल्याचे खडकवाडी येथील आंदोलकांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagitationआंदोलनElectionनिवडणूक