शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

बाजारपेठेतील गर्दीमुळे तीन तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विविध पक्ष, संघटना आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने ...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विविध पक्ष, संघटना आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने २ एप्रिलपासून या संचारबंदीत ७ तासांची सूट दिली आहे. शनिवारी शहरातील बाजारपेठ भागात सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत संचारबंदीमध्ये सूट देण्यात आली आहे. या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येईल, या उद्देशाने ही सूट दिली असली तरी प्रत्यक्षात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. शनिवारी सकाळी १० वाजेपासून नारायणचाळपासून ते नानलपेठ कॉर्नरपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही वाहतूक आणखीनच वाढली. नारायणचाळ ते गांधी पार्क या रस्त्यावर अनेक वाहने विरूद्ध दिशेने रस्त्यावर धावताना दिसली. त्यामुळे तब्बल दीड तास या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. त्याचप्रमाणे कच्छी बाजार भागात जड वाहने नेली जात असल्याने ३ तास वाहतूक ठप्प राहिली. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे अधिकारी-कर्मचारी तसेच या भागात बंदोबस्तासाठी लावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.

संचारबंदीत सूट दिल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे, खरेदी करणाऱ्या नागरिकांपेक्षाही वाहनांची गर्दी अधिक असल्याचे शनिवारी दिसून आले. बाजारपेठ भागात व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानातील साहित्य रस्त्यावर असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शनिवारीही त्याचा प्रत्यय आला.

दुपारी दोन वाजेनंतरही वाहतूक सुरूच

संचारबंदीचा कालावधी संपल्यानंतरही शहरातील सर्वच रस्त्यांवर बिनधास्तपणे वाहतूक सुरू असल्याचे पहावयास मिळाले. संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. सवलतीव्यतिरिक्त शहरातील वाहतूक बंद ठेवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.