शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

बाजारपेठेतील गर्दीमुळे तीन तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विविध पक्ष, संघटना आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने ...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विविध पक्ष, संघटना आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने २ एप्रिलपासून या संचारबंदीत ७ तासांची सूट दिली आहे. शनिवारी शहरातील बाजारपेठ भागात सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत संचारबंदीमध्ये सूट देण्यात आली आहे. या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येईल, या उद्देशाने ही सूट दिली असली तरी प्रत्यक्षात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. शनिवारी सकाळी १० वाजेपासून नारायणचाळपासून ते नानलपेठ कॉर्नरपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही वाहतूक आणखीनच वाढली. नारायणचाळ ते गांधी पार्क या रस्त्यावर अनेक वाहने विरूद्ध दिशेने रस्त्यावर धावताना दिसली. त्यामुळे तब्बल दीड तास या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. त्याचप्रमाणे कच्छी बाजार भागात जड वाहने नेली जात असल्याने ३ तास वाहतूक ठप्प राहिली. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे अधिकारी-कर्मचारी तसेच या भागात बंदोबस्तासाठी लावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.

संचारबंदीत सूट दिल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे, खरेदी करणाऱ्या नागरिकांपेक्षाही वाहनांची गर्दी अधिक असल्याचे शनिवारी दिसून आले. बाजारपेठ भागात व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानातील साहित्य रस्त्यावर असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शनिवारीही त्याचा प्रत्यय आला.

दुपारी दोन वाजेनंतरही वाहतूक सुरूच

संचारबंदीचा कालावधी संपल्यानंतरही शहरातील सर्वच रस्त्यांवर बिनधास्तपणे वाहतूक सुरू असल्याचे पहावयास मिळाले. संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. सवलतीव्यतिरिक्त शहरातील वाहतूक बंद ठेवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.