शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हजारो शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:31 IST

परभणी :सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या मोबदल्यासाठी स्थानिक आपत्ती अंतर्गत ३९ ...

परभणी :सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या मोबदल्यासाठी स्थानिक आपत्ती अंतर्गत ३९ हजार ३१७ शेतकऱ्यांनी तर काढणी पश्चात नुकसानी अंतर्गत ७ हजार ०१ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी केल्या. मात्र या कंपनीने केवळ १८ हजार ९०४ शेतकऱ्यांना ११ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली. त्यामुळे यावर्षीही हजारो शेतकऱ्यांना विमा कंपनीने वाटाण्याच्या अक्षताच दिल्याचे दिसून येत आहे.

२०२०-२०२१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या प्रमुख पिकांचा पेरा केला होता. नैसर्गिक संकटाच्या कचाट्यातून आपल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे उतरविला. त्यापोटी ३२ कोटी ९० लाख १४ हजार ६२४ रुपयांच्या विमा हप्त्याची रक्कम कंपनीकडे भरली होती. यामध्ये सर्वाधिक ३ लाख १६ हजार ९६६ शेतकऱ्यांनी २ लाख ४० हजार ३३ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, १ लाख २४ हजार ८३९ शेतकऱ्यांनी ४५ हजार ८१४ हेक्टरवरील तूर व ५९ हजार ६८४ शेतकऱ्यांनी २३ हजार ६६७ हेक्टरवरील कापूस पिकाचा विमा उतरविला होता. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी स्थानिक आपत्ती अंतर्गत ३९ हजार ३१७ शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्व सूचना कंपनीकडे केली होती. त्याचबरोबर काढणी पश्चात नुकसानीच्या ७ हजार शेतकऱ्यांनी नोंदी कंपनीकडे केल्या होत्या. मात्र या कंपनीने केवळ १८ हजार शेतकऱ्यांना ११ कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे नुकसानीच्या तक्रारी करूनही २७ हजार शेतकऱ्यांना विमा कंपनीने मदत नाकारली आहे. त्यामुळे या विमा कंपनीने वाटाण्याच्या अक्षताच दिल्या आहेत.

केवळ ७२ तासांत नोंदणी न केल्याचे दाखविले जाते कारण

२०२०-२०२१ या खरीप हंगामात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ७ लाख शेतकऱ्यांनी विमा भरून पिके संरक्षित केली आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापूस पीक हातचे गेले आहे. मात्र या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आता ऑनलाईनच्या माध्यमातून तक्रार दाखल केली नसल्याचे कारण देत विमा कंपनीकडून ७ लाख शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही मदत देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासन, कृषी विभाग व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीने फसविले आहे. शासनाने कोट्यवधी रुपयांचा प्रीमियम भरला. शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्याची रक्कम भरली. तरी सुद्धा नुकसान होऊन विमा कंपनी मदत देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कंपनीच्या मालकाच्या घराबाहेर आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही.

माणिक कदम, शेतकरी