शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

तहानलेले निम्नदुधना धरण दोन दिवसांत ७० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी होणार विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 11:28 IST

पाठबंधारे कार्यकारी अभियंता यांचे परभणी जिल्हाधिकाऱ्यांना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत पत्र.

- रेवणअप्पा साळेगावकरसेलू (परभणी) : दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. तर केवळ २४.१० टक्के पाणीपातळीतील तहानलेल्या निम्न दुधना प्रकल्पात सोमवारी सकाळी १० वा.पर्यंत ७०.८५ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता नदिपात्रात केंव्हाही पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर  प्रकल्पाच्याखाली नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्याबाबत जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु. भी. कोरके यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कळविले आहे.

३१ ऑगस्ट रोजी शनीवारी  निम्न दुधना प्रकल्पात २४.१० टक्के जिवंत पाणीसाठा होता. शनीवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. रवीवारी पावसाने चांगलाच जोर धरला.रवीवारी सायंकाळपर्यंत पाणीपातळी २६.४४ टक्यावर गेली. सोमवारी सकाळी ६ वाजता जीवंत जलसाठा ६१.९३ टक्यावर गेला. तो सकाळी ८ वा ६६.५१ टक्केवरून १० वाजता ७०.८५ टक्के असा आहे. दोन दिवसात जवळपास ४६ टक्के पाणी वाढले. तर दुसरीकडं पाणलोट क्षेत्रात काही ठिकाणी भुसंपादना अभावी मावेजा मिळाला नसल्याने यादरम्यान शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन या धरणात पाणी साठवण क्षमता १०० वरुन ७५ टक्यावर आणलेली आहे. त्यामुळे धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ४ टक्के पाणीसाठा लागणार आहे. पाऊस सुरूच राहीला तर हे धरण ७५ टक्के भरेल. या पार्श्वभूमीवर सांडवा किंवा नदिपात्रात केंव्हाही पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. पुर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रकल्पाच्याखाली नदीकाठच्या गावांतील नागरीकांनी नदीपात्रात जाऊ नये, आपापल्या जनावरांची काळजी घेणे वित्त, जीवितहानी होऊ नये, याबाबत सतर्क राहण्याचा इशारा देण्याबाबत जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु.भी. कोरके यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना सोमवारी पहाटे पत्र देऊन कळवीले आहे.

अशी वाढत गेली पाणीपातळीनिम्न दुधना प्रकल्पात पाणीपातळी शनीवारी सकाळी २४.१० टक्के होती.ती संततधार पावसाने रवीवारी रात्री ८ वा.२६.४४ टक्के अशी झाली. सोमवारी पहाटे २ वा. हि टक्केवारी ४९.९४ पर्यंत गेली.त्यानंतर २ तासांनी म्हणजे ४ वा.५५.७६ टक्के झाली. तर सकाळी ६ वा.पाणीपातळी ६१.९३ टक्के तर सकाळी ८ वा.६६.५१ टक्के तर १० वा.७०.८५ म्हणजे २४२.२०० दलघमी असा पाणीसाठा झाला.गेल्यावर्षी २ सप्टेंबर २०२३ रोजी या धरणात जिवंत पाणीसाठा २६.०७ टक्के(६३.१४२ दलघमी )होता.या तुलनेत सद्यस्थितीत ७०.५१  टक्के म्हणजे २४२.२०० दलघमी वर असा समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.

वाहतूक व्यवस्था ठप्प.दोन दिवसापासून जोरावर पावसाने कसुरा नदीला पुर आल्याने परभणी व पाथरी हि वाहतूक ठप्प झाली तर राजवाडी,हातनूर या मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्याने वालूर कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय परतूर मार्ग ही बंद आहे.एकंदरीत रवीवार रात्री पासून वाहतूक ठप्प आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसDamधरणparabhaniपरभणी