-अनिल जोशी
झरी (जि.परभणी) : कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने जाणाऱ्या तीन वारकऱ्यांचा कार- दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. हभप.माऊली दिगंबरराव कदम (३०), हभप. प्रसादराव कदम (४५, दोघे रा. बोर्डी ता. जिंतूर), हभप.दत्ता माणिकराव कऱ्हाळे (३०, रा. मुडा, ता. जिंतूर) अशी मयताची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, माऊली कदम, दत्ता कराळे, प्रसादराव कदम हे तिघे परभणी तालुक्यातील पिंपळा येथील कीर्तन कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री एकच्या सुमारास कीर्तन सोहळा आटोपून दुचाकीने परभणी- जिंतूर मार्गाने बोर्डी गावाकडे निघाले. दरम्यान झरी जवळील लोअर दुधना डाव्या कालव्याच्या जवळ येतात त्यांच्या दुचाकीचा व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्यातील बीट जमादार शंकर हाके यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना परभणी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिघांना मयत घोषित केले. घटनेची माहिती कळताच बोर्डी गावावर शोककळा पसरली.
Web Summary : Three pilgrims died in a car-bike collision near Parbhani. The accident occurred early Saturday while they were returning from a 'Kirtan' program. The deceased, residents of Bordi and Muda, were identified as religious performers. Police are investigating.
Web Summary : परभणी के पास कार-बाइक की टक्कर में तीन तीर्थयात्रियों की मौत हो गई। दुर्घटना शनिवार की सुबह एक 'कीर्तन' कार्यक्रम से लौटते समय हुई। मृतकों की पहचान धार्मिक कलाकारों के रूप में हुई है, जो बोर्डी और मुडा के निवासी थे। पुलिस जांच कर रही है।