शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासन जाणार बांधावर; पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले निर्देश                               

By मारोती जुंबडे | Updated: October 16, 2022 18:49 IST

नुकसान भरपाईसाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या शेतात जाणार आहे.

परभणी: जिल्ह्यातील काही महसूल मंडळात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील सखल भागात पाणी साचल्याने पीक वाया गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महसूल विभाग, कृषी विभाग यांना तात्काळ जायमोक्यावर जाऊन पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. त्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर दिसणार आहे. शेतकऱ्यांनी यावर्षीच्या खरीप हंगामात कमी अधिक पावसावर सोयाबीन व कापूस ही पिके वाढवली. फवारणी, खते यासाठी मोठा खर्च केला. विशेष म्हणजे आता तोंडाशी आलेली सोयाबीनची काढणी सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू आहे. तर कापूस पिकाला बोंडे फुटले आहेत. 

शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांमधून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; मात्र जिल्ह्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवस परतीचा पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाबरोबर वारे सुटल्याने कापूस पीक हे भुईसपाट झाले आहे. जुलैमध्ये अतिवृष्टी, ऑगस्ट महिन्यात सलग २१ दिवस कोरडा गेला आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी बळीराजातून होत होती. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पंचनाम्यांच्या प्रक्रियेतून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये, याचीही दक्षता घेण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी  आंचल गोयल यांना दिले आहेत. याप्रमाणे महसूल विभाग व कृषी विभाग यांनी समन्वयाने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांनो नुकसानीची पूर्वसूचना द्यासद्याच्या स्थितीत सोयाबीन पिकाच्या काढणीस सुरुवात झालेली आहे. तसेच तूर व कपाशी शेतात वाढीच्या अवस्थेत आहे. या अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अधिसूचित पिकांबाबत नुकसानभरपाई लागू आहे. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास पूर्वसूचना देण्याचे आवाहन  पालकमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे. 

इथे करा तक्रारस्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते. जिल्ह्यामध्ये पीक विमाधारक शेतकऱ्यांचे सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यास सदरील शेतकऱ्यांनी नुकसानीच्या ७२ तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲपवर, टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२ वर कॉल करून किंवा customersupport@icicilombard.com या ईमेल वर आपल्या पिकांचे नुकसान झाल्याची पूर्वसूचना पीक विमा कंपनीला कळवणे बंधनकारक आहे.

 शुक्रवारी या मंडळात अतिवृष्टी

  1.   परभणी ........................ ७३
  2.  पेडगाव........................ ८१
  3.   जांब...........................८१
  4.   पिंगळी ......................६७
  5.   पूर्णा.........................७६
  6.   कात्नेश्वर...................६६ 

 

टॅग्स :parabhaniपरभणीTanaji Sawantतानाजी सावंतFarmerशेतकरी