शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

योग्य आहाराबाबत अजूनही अनास्था, ५० टक्के नागरिकांना ॲनिमियाची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 7:44 PM

मॉर्निंग वॉक, योगा करुन शरीर सुदृढ राहण्याचा प्रयत्न केला जात असला तरी आहाराच्या बाबतीत अजूनही जागरुकता झालेली नाही.

परभणी : शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी आहारातील अनियमियता आणि पोषक आहाराच्या कमतरतेमुळे ॲनिमियाची समस्या सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. एका सर्वेक्षणानुसार सर्वच वयोगटातील ५० टक्के नागरिकांमध्ये ॲनिमियाचा त्रास असतो. त्यामुळे शरीर सुदृढतेबरोबरच पोषक आहारावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अलीकडच्या काळात नागरिक आरोग्याच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. मॉर्निंग वॉक, योगा करुन शरीर सुदृढ राहण्याचा प्रयत्न केला जात असला तरी आहाराच्या बाबतीत अजूनही जागरुकता झालेली नाही. त्यात अनियमित आहार घेणे, जंक फूडचा वापर यामुळे शारीरिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण अधिक आहे. २६ नोव्हेंबर रोजी जगभरात ॲनिमिया दिन साजरा केला जातो. तर हा ॲनिमिया नेमका काय आहे? तो होऊ नये यासाठी काय केले पाहिजे? या विषयी येथील वैद्यकीय तज्ज्ञ डाॅ. संदीप कार्ले यांनी विस्ताराने सांगितले.

शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी तसेच शरीराचे दैनंदिन कार्य योग्य प्रमाणात चालण्यासाठी हिमोग्लोबिनचे (लाल रक्तघटक) प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे; परंतु भारतामध्ये लहान मुले, युवक तसेच गर्भवती महिला, स्तनदा माता आदी सर्वच वयोगटात ५० ते ६० टक्के व्यक्तींमध्ये शरीरात रक्ताचे प्रमाण कमी (ॲनेमिया) असण्याची समस्या आढळते. गर्भवती स्त्रियांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्यामुळे गर्भाची वाढ व्यवस्थित होत नाही. शरीरामध्ये लोह, व्हिटॅमिन बी १२, फॉलिक ॲसिडची कमतरता व आहारातील इतर त्रुटी हे ॲनिमियाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने संतुलित आहार घेणे व त्याचबरोबर जाणीवपूर्वक अंगामध्ये रक्ताचे प्रमाण वाढवणारे अन्नपदार्थ खाणे आवश्यक आहे.

आहारात काय असाव?शाकाहारी अन्नामध्ये लोह नॉनहिम प्रकारामध्ये उपलब्ध असते तर मांसाहारी अन्नामध्ये हिम प्रकारचे लोह असते. आपल्या आतड्यांना हिम प्रकारचे लोह शोषून घेणे तुलनेने सोपे जाते. त्यामुळे शाकाहारी आहारात फळे व हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवावे. त्यामुळे व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, बीटा कॅरोटीन या घटकांमुळे आतड्यांना नॉन हिम प्रकारचे लोह शोषून घेण्यास मदत होते. विशेषत: शाकाहारी व्यक्तींच्या आहारात योग्य प्रमाणात फळे, भाज्या, डाळी, कडधान्य यांचे मिश्रण असावे.

ॲनिमियाचे दुष्परिणामसतत थकवा जाणवतो, मुलांची वाढ कमी होते. कुपोषण होते. मुले हट्टी व चिडचिडी होतात. मेंदूच्या वाढीवर परिणाम होतो. प्रतिकारक्षमता कमी होते. सतत आजारी पडतात. शेवटी वजन, उंची वाढीवर विपरीत परिणाम होतो.

संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मुलांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक असणे ही उत्तम आरोग्याची व बौद्धिक विकासाची गुरुकिल्ली आहे. मुलांना पौष्टिक आहार खाऊ घालणे हे केवळ आईचे काम नसून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे.- डॉ. संदीप कार्ले

टॅग्स :Healthआरोग्यparabhaniपरभणी