शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लाटेत साडेसात टक्क्यांनी वाढला पॉझिटिव्हिटी रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

परभणी : दोन वर्षांच्या कोरोना संसर्ग काळामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ...

परभणी : दोन वर्षांच्या कोरोना संसर्ग काळामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक गंभीर होती. या लाटेत ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट ७.४३ टक्‍क्‍यांनी अधिक राहिला. आता तिसऱ्या लाटेचीही धास्ती कायम असून, पुढे काय वाढून ठेवले आहे, याची नागरिकांना चिंता लागली आहे.

मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या काळात कोरोनाची पहिली लाट जिल्ह्यात निर्माण झाली होती. या काळात ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा विचार करता १ हजार ८७४ नागरिकांना लागण झाली. तर ९२ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला. पहिल्या लाटेतील पॉझिटिव्हिटी दर ४.२९ टक्के एवढा राहिला आहे. साधारणतः जानेवारी २०२१ ते मे २०२१ या पाच महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. पाच महिन्यांच्या काळात बाधित रुग्णांची संख्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढली. १८ हजार २०० नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. तर ३८७ नागरिकांना या लाटेत जीव गमवावा लागला. दुसऱ्या लाटेत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ११.७२ टक्के एवढा राहिला. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ७.४३ टक्‍क्‍यांनी पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे.

मार्च २०२० पासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरुवातीला कोरोना नेमका काय आहे, त्यावर उपचार काय करायचे, याविषयी अनभिज्ञता होती. सर्वसामान्य नागरिकांसह वैद्यकीय तज्ज्ञांमध्येही संभ्रमावस्था होती; परंतु पहिल्या लाटेतील अनुभव दुसऱ्या लाटेत उपचार करण्यासाठी कामी आले. असे असले तरी पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट जिल्ह्यासाठी अधिक धोकादायक आणि गंभीर ठरली आहे. अनुभवाची शिदोरी हाती असतानाही या लाटेत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूचा दर कमी करण्यात अपयश आले, हे मान्य करावे लागेल. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही या लाटेमध्ये भरडला गेला आहे.

कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांचा अनुभव जिल्ह्याच्या गाठीशी असून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. काही जणांच्या मते तिसरी लाट अधिक धोकादायक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मागील दोन लाटांनी दिलेले अनुभव तिसऱ्या लाटेमध्ये कितपत उपयोगात येतात, हे येणारा काळच ठरविणार आहे.

२३ टक्क्यांनी वाढले मृत्यू

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जिल्ह्यात ९२ नागरिकांवर मृत्यू ओढावला. दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या ३८७ एवढी आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण २३ टक्क्यांनी वाढले आहे. यावरून दुसरी लाट किती गंभीर होती, हे लक्षात येते.

ग्रामीण भागात २० हजार रुग्ण

कोरोनाच्या दोन्ही लाटांत ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात भरडला गेला असून, २० हजार ७४ रुग्णांना कोरोनाची लागण झाली. तर ४७९ रुग्णांना या दोन्ही लाटांत मिळून जीव गमवावा लागला. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे हे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनीच पुढाकार घेऊन काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.